शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

रेल्वे महाव्यवस्थापकांच्या आगमनाने फलाट चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल मुंबईहून १२ बोगीच्या विशेष रेल्वे गाडीने चमूसह आले होते. ...

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल मुंबईहून १२ बोगीच्या विशेष रेल्वे गाडीने चमूसह आले होते. रेल्वेच्या आतील समस्या तशाच राहिल्या. मात्र, त्यांच्या आगमनामुळे फलाट क्रमांक एक एकदम चकाचक झाला आहे.

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील क्रमांक एक फलाटाची रंगरंगोटी करण्यात आली. भिंती रंगल्या. वन्यप्राण्यांच्या पुतळ्यांना नवसंजीवनी देण्यात आली. पुलाच्या पायऱ्यांवर नवे चित्र लावण्यात आले. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची विशेष गाडी फलाट क्रमांक एकवर आल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक चकाचक पाहून प्रचंड खूश झाले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांची मनात धाकधूक होती की, जर ४ आणि ५ फलाटावर गेले, तर काय होणार, परंतु एका तासाच्या वेळेत रेल्वे कार्यालयाच्या भेटीतच महाव्यवस्थापकाचा वेळ निघून गेला. अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. या दिवशी मात्र फ्लॅट क्रमांक एकवर कोणतीही प्रवासी गाडी घेण्यात आली नाही. दोन महिन्यांपासून नागपूर येथून रेल्वेचे सर्व बडे अधिकारी येऊन स्थानकावरील कमीपणा दूर करीत होते. त्यानंतरही फलाट क्रमांक चार व पाच रंगरंगोटीविनाच राहिला. फलाटावर लागलेल्या जुन्या फरशाही नादुरुस्त राहिल्या. अनेक ठिकाणी रेल्वे प्रवाशांना गाडी पकडताना ठेस लागून पळण्याची भीती कायमच आहे. पायऱ्यावरचे जुने चित्र बदलण्यात आले नाही. फलाटावर एक वर्षापासून शेडचे व इतर कामही थंड्याबस्त्यात आहे. काही नळांना तर पाणी येण्याची वाट पाहावी लागते. बल्लारशाह रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे झोनचे शेवटचे व महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. इथल्या ५ फलाटावरून तामिळनाडू ते दिल्लीकडे जाणारी गाड्यांची वर्दळ असते. या स्थानकावरूनच गाडीचालक, गार्ड, तिकीट निरीक्षकचा स्टाफ बदलतो. डब्यांची देखभाल करण्यात येते, सर्व कोचमध्ये पाणी भरण्यात येते, म्हणूनच दर तीन वर्षांनी मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सरळ बल्लारशाह स्थानकावर येतात. येथूनच त्यांचा रेल्वे स्थानकांना भेटी देण्याचा दौरा सुरू होतो. बल्लारशाह रेल्वे स्थानक इतके महत्त्वाचे असताना, इथल्या रेल्वे प्रवासी संघटनांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावर महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन निवेदन द्यावे लागले व चर्चा करावी लागली, याची खंत डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनी व्यक्त केली.