शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:13 IST

शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़

ठळक मुद्देनगर परिषद : शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावू नका

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़खर्रा पन्नी ही स्वच्छतेच्या मार्गातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे़ त्यामुळे यावर शंभर टक्के नियंत्रण आणण्यासाठी न.प. द्वारे विशेष पथक तयार केले, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली़ जनजागृती सुरु असून नव्या दमाने अंमलबजावणी केली जात आहे़ राज्य सरकारने बंदी घातल्याने घरात असलेला प्लॉस्टिकचा साठा नागरिक भितीपोटी न.प.कडे जमा करीत असल्याचे दिसून येत आहे़जुन्या वस्तुंना येणार ‘अच्छे दिन’काळानुरुप कोणत्या व्यवसायाला ‘अच्छे दिन‘ केव्हा येतील सांगता येत नाही. प्लॉस्टिक बंदीमुळे नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला आहे. लग्नात वापरण्यात येणाऱ्या प्लॉस्टिक थर्माकोल प्लेटऐवजी पळस, कुकडी पानाच्या पत्रावळी व द्रोण वापरण्याचे वापर प्रमाण वाढू शकते़ किराणा दुकानात प्लॉस्टिकऐवजी कागदाच्या पुड्यांचा वापर वाढू शकतो़ कापड दुकानातील प्लॉस्टिक वापरणे बंद झाल्यास कापडी थैल्यांना चांगले दिवस येतील़ प्लॉस्टिकमुळे पर्यावरण व मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे़ त्यामुळे जुन्या काळातील वस्तु वापरण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास काही व्यवसायाला ’अच्छे दिन’ येण्यास वेळ लागणार नाही़खर्रा पन्नी मोठी समस्याप्लॉस्टिक बंदी झाल्यास खर्रा पन्नीची सर्वात मोठी समस्या निर्माण होणार आहे. शहरात सर्वाधिक प्लॉस्टिक खर्रा पन्नीमुळे पसरला अशी माहिती महिलांनीच कार्यशाळेत दिली़ त्यामुळे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे़कर्करुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढप्लास्टिकवर रसायन टाकूनही जमिनीत विरघळत नाही़ ते प्लॉस्टिक पोटातही विरघळत नाही़ प्लॉस्टिकसहीत अन्य घटकांमुळे कर्करोगींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्लॉस्टिक शरीराच्या आत गेल्यानंतर विघटनाच्या क्रिया बिघडते़ अपचनीय असल्याने एकाच ठिकाणी राहते. विविध प्रक्रिया घडून पेशींमध्ये अनिष्ट बदल होतात़ यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे़ त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर टाळणे बंद करण्याची गरज आहे़ पर्यावरणावरही याचा दुष्परिणाम होतो. खर्रा घासण्याच्या प्रक्रियेत पन्नीचा वापर होतो. त्या पन्नीचे कण पोटात जातात त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.- डॉ. विवेक शिंदे,भद्रावती.महिलांकडून जनजागृतीमहिला बचतगटांद्वारे प्लॉस्टिक बंदीविषयी जनजागृती केली जात आहे़ उन्नती बचत गटाच्या महिलांनी नागरिक तसेच व्यावसायिकांना जागृतीची पत्रके वाटली. येत्या तीन दिवसांत विविध महिला बचत गटांद्वारे जनजागृती मोहीम गतिमान केली जाणार आहे़शासनाच्या सगळ्या योजना राबविण्यात भद्रावतीकर अग्रेसर आहेत. प्लॉस्टिक बंदीबाबत सुद्धा भद्रावतीकर सहकार्य करतील, अशी पालिकेला मला खात्री आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष,न.प. भद्रावती