शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:13 IST

शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़

ठळक मुद्देनगर परिषद : शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावू नका

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़खर्रा पन्नी ही स्वच्छतेच्या मार्गातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे़ त्यामुळे यावर शंभर टक्के नियंत्रण आणण्यासाठी न.प. द्वारे विशेष पथक तयार केले, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली़ जनजागृती सुरु असून नव्या दमाने अंमलबजावणी केली जात आहे़ राज्य सरकारने बंदी घातल्याने घरात असलेला प्लॉस्टिकचा साठा नागरिक भितीपोटी न.प.कडे जमा करीत असल्याचे दिसून येत आहे़जुन्या वस्तुंना येणार ‘अच्छे दिन’काळानुरुप कोणत्या व्यवसायाला ‘अच्छे दिन‘ केव्हा येतील सांगता येत नाही. प्लॉस्टिक बंदीमुळे नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला आहे. लग्नात वापरण्यात येणाऱ्या प्लॉस्टिक थर्माकोल प्लेटऐवजी पळस, कुकडी पानाच्या पत्रावळी व द्रोण वापरण्याचे वापर प्रमाण वाढू शकते़ किराणा दुकानात प्लॉस्टिकऐवजी कागदाच्या पुड्यांचा वापर वाढू शकतो़ कापड दुकानातील प्लॉस्टिक वापरणे बंद झाल्यास कापडी थैल्यांना चांगले दिवस येतील़ प्लॉस्टिकमुळे पर्यावरण व मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे़ त्यामुळे जुन्या काळातील वस्तु वापरण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास काही व्यवसायाला ’अच्छे दिन’ येण्यास वेळ लागणार नाही़खर्रा पन्नी मोठी समस्याप्लॉस्टिक बंदी झाल्यास खर्रा पन्नीची सर्वात मोठी समस्या निर्माण होणार आहे. शहरात सर्वाधिक प्लॉस्टिक खर्रा पन्नीमुळे पसरला अशी माहिती महिलांनीच कार्यशाळेत दिली़ त्यामुळे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे़कर्करुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढप्लास्टिकवर रसायन टाकूनही जमिनीत विरघळत नाही़ ते प्लॉस्टिक पोटातही विरघळत नाही़ प्लॉस्टिकसहीत अन्य घटकांमुळे कर्करोगींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्लॉस्टिक शरीराच्या आत गेल्यानंतर विघटनाच्या क्रिया बिघडते़ अपचनीय असल्याने एकाच ठिकाणी राहते. विविध प्रक्रिया घडून पेशींमध्ये अनिष्ट बदल होतात़ यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे़ त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर टाळणे बंद करण्याची गरज आहे़ पर्यावरणावरही याचा दुष्परिणाम होतो. खर्रा घासण्याच्या प्रक्रियेत पन्नीचा वापर होतो. त्या पन्नीचे कण पोटात जातात त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.- डॉ. विवेक शिंदे,भद्रावती.महिलांकडून जनजागृतीमहिला बचतगटांद्वारे प्लॉस्टिक बंदीविषयी जनजागृती केली जात आहे़ उन्नती बचत गटाच्या महिलांनी नागरिक तसेच व्यावसायिकांना जागृतीची पत्रके वाटली. येत्या तीन दिवसांत विविध महिला बचत गटांद्वारे जनजागृती मोहीम गतिमान केली जाणार आहे़शासनाच्या सगळ्या योजना राबविण्यात भद्रावतीकर अग्रेसर आहेत. प्लॉस्टिक बंदीबाबत सुद्धा भद्रावतीकर सहकार्य करतील, अशी पालिकेला मला खात्री आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष,न.प. भद्रावती