शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

प्लास्टिकबंदी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम ...

ठळक मुद्देमोहीम थंडावली : बाजारात सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवित अनेकांवर कारवाई केली. अनेकांकडून दंड वसूल केला. मात्र आता ही मोहीम थंडावली असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच झाल्याचे बोलले जात आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदीनंतर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करुन दंड वसूल केल्याने काही प्रमाणात प्लास्टिक वापरावर अंकूश बसला. यादरम्यान दुकानदारांकडूनसुद्धा प्लास्टिक नसल्याचे सांगितले जायचे त्यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात कॅरिबॅगचा वापर बंद झाला होता. यादम्यान मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिक, थर्माकोल, अविघटनशील वस्तूचे वापर, व विक्री करणाऱ्या दुकानामध्ये धाड टाकून प्लास्टिकसाठा जप्त केला. तर अनेकांकडून दंड वसूल केला. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला होता. मात्र सध्यास्थितीत ही मोहीम थंडावल्याने पुन्हा कॅरिबॅग बाजारात तसेच दुकानामध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर मोहीमेची अमंलबजावणी कागदावरच झाल्याचे स्पष्ट होत आहे.दुकानदारांकडून लूटप्लास्टिक पिशवी बंद झाल्यामुळे बाजारामध्ये कापडी पिशव्याचा वापर सुरु झाला. या पिशव्या दुकानात ठेऊन पिशवी नसल्याचे सांगत ग्राहकांकडून पिशवीचे दोन ते तीन रुपये अतिरिक्त आकारत आहेत. मात्र ग्राहकांजवळ साहित्य नेण्यासाठी दुसरे साधन उपलब्ध नसल्याचे अतिरिक्त रक्कम देऊन पिशवी खरेदी करावी, लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.जनजागृतीचा अभावप्लास्टिक पिशवी बंदीबाबत मनपा प्रशासन तसेच प्रदूषण मंडळातर्फे पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाली नाही. तसेच कारवाईची मोहीमसुद्धा थंडावल्याने जिल्ह्याभरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे जनावरांना धोकाएकदा तयार झालेले प्लास्टिक कधीच नष्ट होत नाही.परिणामी नद्या- नाल्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच जमिनीमध्येही पिशवीचे विघटन होत नसल्याने अनेक प्राणी या पिशव्या खात असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते. त्यामध्ये त्याचा जीवही जाऊ शकतो.