शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

झाडे लावली अन् तोडलीही

By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST

महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने 'हिरवं शहर, स्वच्छ शहर' असे आश्‍वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला ..

मनपाची घोषणा फसवी : हिरवे शहर, स्वच्छ शहरांचे स्वप्न भंगलेचंद्रपूर : महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने 'हिरवं शहर, स्वच्छ शहर' असे आश्‍वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला तरी या आश्‍वासनाचा पत्ता नाही. उलट शोभेची लावलेली झाडेदेखील आता सुकली आहेत. लाखो रुपयांचा हा खर्च वाया गेला आहे. ६00 पैकी केवळ २५ते ३0 झाडे सध्या जिवंत आहेत.चंद्रपूरला महानगरचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. ही सत्ता मिळविण्यासाठी ज्या घोषणा देण्यात आल्या. त्यामध्ये हिरव्या शहराची घोषणा होती. शहरात झाडे नसल्याचे तापमानही खूप वाढत असते. त्या दृष्टीने काँग्रेसने महत्त्वाची घोषणा केल्याने लोकांनीही प्रतिसाद दिला.या घोषणेची पूर्तता करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने शहरातील प्रमुख मार्गावर पाम प्रजातीची झाडे लावण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी ४00 पाम झाडे आणि ७00 ट्री गार्ड खरेदी केले. यासाठी १0 लाख रुपयांचा खर्च केला. मुख्य असलेल्या गांधी आणि कस्तुरबा या दोन मार्गावर ही झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मात्र त्यांचे नीट संगोपन नसल्याने अवघ्या वर्षभरात ही झाडे सुकून गेली. अनेक झाडे रस्ता बांधकामात उखडण्यात आली. रस्त्याच्या कडेला 'पेवर ब्लॉक' टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीसुद्धा ही झाडे काढून फेकण्यात आली.आधीच चंद्रपुरात झाडे नाहीत आणि जी लावली ती टिकवण्याचा प्रयत्नही झाला नाही. त्यामुळे हिरव्या शहराची घोषणा ही फसवीच निघाली.खासगी उद्योगांना वृक्षारोपण सक्तीचे आहे. पण, तेही कधी वृक्षारोपण करीत नाहीत. नेत्यांना तर मलिदा खाणे, एवढेच माहिती आहे. त्यामुळे उद्योगांवर त्यांचाही अंकुश राहिलेला नाही. आता महापालिकेनेही तेच केले. खर्च करून लावलेल्या झाडांचेही संगोपन करता येत नसेल, तर अशा प्रकल्पांवर खर्च करायचाच कशाला, हे शहाणपण कुणालाही सुचले नाही. नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि संगोपन करावे, असा उलट सल्ला महापालिका देत आहे. (शहर प्रतिनिधी)