शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावली अन् तोडलीही

By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST

महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने 'हिरवं शहर, स्वच्छ शहर' असे आश्‍वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला ..

मनपाची घोषणा फसवी : हिरवे शहर, स्वच्छ शहरांचे स्वप्न भंगलेचंद्रपूर : महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने 'हिरवं शहर, स्वच्छ शहर' असे आश्‍वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला तरी या आश्‍वासनाचा पत्ता नाही. उलट शोभेची लावलेली झाडेदेखील आता सुकली आहेत. लाखो रुपयांचा हा खर्च वाया गेला आहे. ६00 पैकी केवळ २५ते ३0 झाडे सध्या जिवंत आहेत.चंद्रपूरला महानगरचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. ही सत्ता मिळविण्यासाठी ज्या घोषणा देण्यात आल्या. त्यामध्ये हिरव्या शहराची घोषणा होती. शहरात झाडे नसल्याचे तापमानही खूप वाढत असते. त्या दृष्टीने काँग्रेसने महत्त्वाची घोषणा केल्याने लोकांनीही प्रतिसाद दिला.या घोषणेची पूर्तता करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने शहरातील प्रमुख मार्गावर पाम प्रजातीची झाडे लावण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी ४00 पाम झाडे आणि ७00 ट्री गार्ड खरेदी केले. यासाठी १0 लाख रुपयांचा खर्च केला. मुख्य असलेल्या गांधी आणि कस्तुरबा या दोन मार्गावर ही झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मात्र त्यांचे नीट संगोपन नसल्याने अवघ्या वर्षभरात ही झाडे सुकून गेली. अनेक झाडे रस्ता बांधकामात उखडण्यात आली. रस्त्याच्या कडेला 'पेवर ब्लॉक' टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीसुद्धा ही झाडे काढून फेकण्यात आली.आधीच चंद्रपुरात झाडे नाहीत आणि जी लावली ती टिकवण्याचा प्रयत्नही झाला नाही. त्यामुळे हिरव्या शहराची घोषणा ही फसवीच निघाली.खासगी उद्योगांना वृक्षारोपण सक्तीचे आहे. पण, तेही कधी वृक्षारोपण करीत नाहीत. नेत्यांना तर मलिदा खाणे, एवढेच माहिती आहे. त्यामुळे उद्योगांवर त्यांचाही अंकुश राहिलेला नाही. आता महापालिकेनेही तेच केले. खर्च करून लावलेल्या झाडांचेही संगोपन करता येत नसेल, तर अशा प्रकल्पांवर खर्च करायचाच कशाला, हे शहाणपण कुणालाही सुचले नाही. नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि संगोपन करावे, असा उलट सल्ला महापालिका देत आहे. (शहर प्रतिनिधी)