शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील व जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याचे अचूक नियोजन करा. पारंपरिक स्त्रोत जिवंत करा. कामांची गती वाढवा, अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगारावा लागेल, अशा शब्दात राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे अधिकाºयांचा क्लास घेतला.चंद्रपूर ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकाºयांना स्पष्ट निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील व जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याचे अचूक नियोजन करा. पारंपरिक स्त्रोत जिवंत करा. कामांची गती वाढवा, अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगारावा लागेल, अशा शब्दात राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे अधिकाºयांचा क्लास घेतला.चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये यावर्षीच्या पावसाची उपलब्धता बघता, ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणी टंचाई संदर्भात सामान्य नागरिकांना सध्या कुठल्याही पाणी कपातीला सामोरे जाण्याचे काम पडू देऊ नका. उपलब्ध जलसाठ्याचे बळकटीकरणाची मोहिम पुढील काही दिवस राबविण्याचे नियोजन करण्याचेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.जिल्ह्यात अत्यंत कठीण परिस्थितीत देखील पुढील अनेक वर्षात समस्या राहू नये, यासाठी धानोरा-आमडी या ठिकाणच्या बॅरेजचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी महापालिकेने सूचविलेल्या उपाय योजनांना मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत वितरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच जिल्हा परिषद, मनपा व नगरपालिकेच्या अधिकाºयांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे उपस्थित होते.पाणी कपातीचा प्रस्ताव नाकारलासंभाव्य पाणी टंचाई बघता पाणी पुरवठा एक दिवस आड करणे, नवीन नळ कनेक्शन बंद करणे आदी प्रकार करु नका. चंद्रपूर शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी नाकारला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा आरक्षित पाणीसाठा प्रसंगी वापरला तरी चालेल. मात्र शहरातील सामान्य नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.पाणी समस्येवर बुधवारी मुंबईत बैठकचंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्यासाठी पाऊस न झाल्यास चारगाव धरण, लालनाला प्रकल्प, गोसेखूर्द प्रकल्प, माना खाण, धानोरा स्त्रोत आदी ठिकाणच्या शक्यता तपासून पाहण्यात आल्या. या संदर्भात ६ सप्टेंबरला मुंबईत बैठक होणार असून संभाव्य पाणी टंचाईवर यामध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.