शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीदीक्षित आश्रमशाळा वाऱ्यावर

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील शासकीय आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर उभा असून एकही जबाबदार अधिकारी या आश्रमशाळेत नाही. येथील विद्यार्थ्यांचे भविष्य

भेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील शासकीय आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर उभा असून एकही जबाबदार अधिकारी या आश्रमशाळेत नाही. येथील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून निवासी शासकीय आश्रमशाळा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. या आश्रमशाळेत मुली ६७ तर मुले ५१ सर्व निवासी आहेत. या विद्यार्थ्यांची निवासाची व शिक्षणाची जबाबदारी असलेलेच येथील अधिकारी मागील सहा महिन्यांपासून बदली होऊन गेल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर कारभार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काहीही देणे-घेणे प्रशासनाला नसल्याचे दिसते. या आश्रमशाळेत २६ मार्च २०१२ रोजी आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागामार्फत विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी सोलर वाटर प्रकल्प मंंजूर असून त्यांचे साहित्य आश्रमशाळेत पडले आहेत.दोन वर्षांपासून हे साहित्य पडून असतानाही प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पाला आश्रमशाळेत जागाच नसल्याचे कारण पुढे करुन साहित्य धूळखात ठेवले आहेत. आश्रमशाळेत जागा उपलब्ध असून साहित्य आल्यापासून आश्रमशाळेत सोलरवॉटर प्रकल्प लावण्याकरिता कुणी आलेच नसल्याचे वास्तव्य तेथील कर्मचाऱ्यांनी सदर प्रतिनिधीसमोर मांडले.या आश्रमशाळेत मुलींसाठी प्रसाधनगृहाची वेगळी सोय केली आहे. मात्र हे प्रसाधनगृह सध्या घाणीच्या विळख्यात आहे. यावरुन तेथील स्वच्छतेबाबत शाळा प्रशासन किती जागरुक आहे, याची जाण होते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या आश्रमशाळेत सहा महिन्यांपूर्वी मुख्याध्यापक कापसे यांची बदली झाल्याने त्याऐवजी दुसरे कुणी मुख्याध्यापक आले नाही. तसेच अधीक्षक माळी यांची बदली सहा महिन्यांपूर्वीच झाल्याने त्यांचे अधीक्षक पद रिक्त असून प्रभार चालाख या शिक्षकांकडे आहे तर मुलींसाठी अधिक्षिका या वर्षभरापासून नसल्याने त्याही प्रभारीच आहेत. आश्रमशाळेत १ ते १४ वर्षापर्यंत वयोगटातील विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याकरिता शाळा व्यवस्थापनाने कुठलीही सोय केली नाही. या मुलांना स्वत:चे कपडे धुता येत नसल्याने विद्यार्थ्यांना मळकट कपडे घालून विद्यार्जन करावे लागत आहे. डोक्याला लावण्याचे तेलही विद्यार्थ्यांना वर्षभरापासून मिळालेले नाही. संस्कारमय वयातच विद्यार्थ्यांना बेशिस्तीचे धडे मिळत असल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर)