शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:47 IST

तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

ठळक मुद्देवरोरा-चिमूर मार्गालगत पुनर्वसन : वनविभागाकडून कार्यवाही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असावा, मानवी हस्तक्षेप नसावा याकरिता मागील काही वर्षांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे इतरत्र पुर्नवसन करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खातोडा, वनली या गावांचे वरोरा तालुक्यातील वनविभागाच्या जागेवर पुर्नवसन करण्यात आले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि) या गावाचे वरोरा-चिमूर मार्गालगत सालोरा गावानजीक वनविभागाच्या ७०० एकर जागेमध्ये ५२ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कुटुंबियानी होकार दिल्याने वनविभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसित जागेत घराचे बांधकाम सुरु केले आहे.एका कुटुंबास शेतीकरिता पाच एकर जमीन, घराकरिता दोन हजार स्केअर फूट जागा व पक्के स्लॅबचे घर बांधण्यात येणार आहे. पुनर्वसन वस्ती मध्ये पथदिव्यांसोबतच विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरिता सौरउर्जेवरचे पंप बसविण्यात आले आहे. सौर उर्जेचे पथदिवे, दहा घर मिळून एक सौर ऊर्जा पाणी पंप देण्यात आला आहे. प्रत्येक घरावर एक पाण्याची टाकी ठेवली जाणार असून घरात पाणी पुरवठा पाईप लाईन तसेच घरातील विद्युतीकरणही करुन दिले जाणार आहे. यासोबत या पुनर्वसित पळसगाव (शि) गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व शाळेच्या इमारती बांधण्यात आल्या आहे. सध्या पोच व अंतर्गत रस्त्याची कामे जोमात सुरू आहेत.घर तिथे शौचालयनागरिकांना घरे बांधून देत असताना भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधले जाणार आहेत. त्यामुळे गावात स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभाग व्यक्त करीत आहे.जून- जुलै महिन्यातच पूर्नवसनाची कामे पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जर पावसाळा लवकर सुरु झाल्यास दोन ते महिने कामे होणार नसले तरी डिसेंबर महिन्यात पूर्नवसीत झालेल्या पळसगाव (शि) ये कुटुंब वास्तव्यास येतील.- गजेंद्र नरवने, उपसंचालक (बफर)ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर