शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:47 IST

तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

ठळक मुद्देवरोरा-चिमूर मार्गालगत पुनर्वसन : वनविभागाकडून कार्यवाही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असावा, मानवी हस्तक्षेप नसावा याकरिता मागील काही वर्षांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे इतरत्र पुर्नवसन करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खातोडा, वनली या गावांचे वरोरा तालुक्यातील वनविभागाच्या जागेवर पुर्नवसन करण्यात आले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि) या गावाचे वरोरा-चिमूर मार्गालगत सालोरा गावानजीक वनविभागाच्या ७०० एकर जागेमध्ये ५२ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कुटुंबियानी होकार दिल्याने वनविभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसित जागेत घराचे बांधकाम सुरु केले आहे.एका कुटुंबास शेतीकरिता पाच एकर जमीन, घराकरिता दोन हजार स्केअर फूट जागा व पक्के स्लॅबचे घर बांधण्यात येणार आहे. पुनर्वसन वस्ती मध्ये पथदिव्यांसोबतच विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरिता सौरउर्जेवरचे पंप बसविण्यात आले आहे. सौर उर्जेचे पथदिवे, दहा घर मिळून एक सौर ऊर्जा पाणी पंप देण्यात आला आहे. प्रत्येक घरावर एक पाण्याची टाकी ठेवली जाणार असून घरात पाणी पुरवठा पाईप लाईन तसेच घरातील विद्युतीकरणही करुन दिले जाणार आहे. यासोबत या पुनर्वसित पळसगाव (शि) गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व शाळेच्या इमारती बांधण्यात आल्या आहे. सध्या पोच व अंतर्गत रस्त्याची कामे जोमात सुरू आहेत.घर तिथे शौचालयनागरिकांना घरे बांधून देत असताना भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधले जाणार आहेत. त्यामुळे गावात स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभाग व्यक्त करीत आहे.जून- जुलै महिन्यातच पूर्नवसनाची कामे पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जर पावसाळा लवकर सुरु झाल्यास दोन ते महिने कामे होणार नसले तरी डिसेंबर महिन्यात पूर्नवसीत झालेल्या पळसगाव (शि) ये कुटुंब वास्तव्यास येतील.- गजेंद्र नरवने, उपसंचालक (बफर)ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर