शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

चिंचाळा जि. प. शाळा बनली आंतरराष्ट्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:02 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.

ठळक मुद्देगुणवत्ता सुधारणार : राज्यातील केवळ १३ शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळाच्या नामफलकाचे अनावरण जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे, सभापती समाजकल्याण ब्रिजभूषण पाझारे, सभापती कृषी व पशुसंवर्धन अर्चना जीवतोडे, सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत ढोडरे, प्रविण बोडेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांची उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षणमातृभाषेतून शिक्षण व इंग्रजीवर प्रभुत्व या पध्दतीने शाळेचे शिक्षण होणार आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या चिंचाळा येथील शाळेमध्ये नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण डोर्लीकर, संगीता बेले यांनी केले तर मुख्याध्यापक नामदेव आस्वले यांनी उपस्थितांचे आभार मानले.