शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रबी हंगामासाठी कीटकनाशक औषधे पोहोचलीच नाहीत

By admin | Updated: October 25, 2015 00:58 IST

शासनाच्यावतीने सबसिडीवर दरवर्षी कीटकनाशक औषधांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येतो.

वरोरा : शासनाच्यावतीने सबसिडीवर दरवर्षी कीटकनाशक औषधांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येतो. परंतु यावर्षी खरीप हंगाम संपला व रब्बी हंगामाला सुरूवात होवूनही शासनाकडून सबसीडीवर देण्यात येणारी कीटकनाशक औषधे शासनाच्या वितरण करणाऱ्या कार्यालयात पोहोचली नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासनाच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजना आदी योजनेतून खरीप व रबी हंगामातील पिकांवरील अळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच पिकातील झाडांना कुठलीही रोगराई होवू नये व भरघोस पीक शेतकऱ्यांच्या हाती यावे, यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कामेथोल्ट, सल्फर, कार्बन डायझीम, सायबर मेथ्रीन, मोनोकोटोफास फ्लोरोफॉस आदी कीटकनाशक औषध शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी खरीप हंगाम संपला रब्बी हंगामाला सुरूवात झाली. परंतु सबसीडीवर मिळणारे कीटकनाशक औषधी अद्यापही पोहोचल्या नाही. त्यामुळे शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी बाजारातून किटकनाशक औषधी खरेदी करीत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. कपाशीला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव शासनाने जाहीर केला. पावसाच्या लहरीपणाने सोयाबीनच्या उत्पादनात घट आली. ेअशातच सध्या शेतात असलेल्या कपाशी, तूर, भात आदी पिकांवरील रोगराई थांबविण्यासाठी शेतकरी बाजारपेठेतून कीटकनाशक औषधी विकत घेत आहे. सध्या सोयाबीनचा दाणा अगदी लहान असल्याने त्याला बाजारात भाव नाही, अशावेळी शेतात असलेले पीक कसे वाचवावे, अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. सबसिडीवरील कीटकनाशक औषधी कधी येणार, या प्रश्नाचे उत्तरही देण्यास संबंधित अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)