शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
10
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
11
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
12
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
13
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
14
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
15
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
16
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
17
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
18
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
19
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
20
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

कीटकनाशके निघाली भ्रष्ट, धानपिक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:06 IST

तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देधानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकदा विविध औषधांची फवारणी करूनही धानपिक हातातून गेल्याने कीटकनाशके निघाली भ्रष्ट आणि धानपिक झाले नष्ट, अशी शेतकºयांची ओरड सुरू आहे.याबाबत परिसरातील अनेक शेतकºयांनी तहसीलदार टेंबेकर यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी लेखी निवेदन दिले आहे. त्यानुसार तालुका परिसरातील शेतकºयांच्या बांधावर कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण करणे सुरू असून शुक्रवारी देवाडा खुर्द येथे कृषी सहाय्यक राठोड यांच्यासमवेत अनेक शेतकºयांनी परिसरातील नष्ट झालेले धानपीक दाखविले आणि तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील परिसरामध्ये यावर्षी तुरळक पाऊस पडला. तरीही धानपिक चांगल्या स्थितीत होते. मात्र धानपीक गर्भाशयात असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी विविध प्रकारची महागडी औषधे विकत घेऊन फवारणी केली. मात्र अनेक प्रयत्नानंतरही रोग नियंत्रणात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.हाती आलेले धानपिक जावू नये यासाठी प्रत्येकांनी जीवाची पर्वा न करता पाठीवर सारखा पंप घेऊन फवारणी केली. त्यांच्या या परिश्रमाला काही प्रमाणात यश सुद्धा आले. त्यामुळे बेरड, करपा, लाल्या आदी रोग नियंत्रणात आणता आले. काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक हाती येण्याची शक्यता होती. परंतु तग धरून असलेल्या धानपिकाला मावा तुडतुडा या भयंकर रोगाने ग्रासल्याने नानाविध प्रकारची औषधी फवारणी करून सुद्दा या रोगाला नियंत्रणात आणने कठीण झाल्याने अखेर परिसरातील शेतकºयांचे धानपिकाचे तणसात रूपांतर झाले आहे.या पिकाची कापणी करून जनावरांना चारा टाकणे सुद्धा कठीण झाले आहे. देवाडा खुर्द येथील शेतकरी गणपती स्पतरे यांनी तर फवारणी करताना घरी आले आणि चिंतेने बेहोश पडले. त्यांना येथील शेतकºयांनी चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. पाच-सात दिवसानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्याची सुट्टी करून आणल्यानंतर आजही त्याच्या डोळ्यासमोर धानपिकाचे वाईट चित्र दिसत असल्याने ते धानपिक गेले, असे सारखे वेड्यासारखे बळबळत असतात. ते कुणालाही ओळखत नाही, अशी अवस्था झाली आहे.शेतकºयांचा जीव मेटाकुटीलासावली : तालुक्यातील धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकरी औषधांची फवारणी करता करता हवालदिल झाले आहेत. या वर्षीच्या उष्ण व दमट हवामानामुळे आणि अत्यल्प पावसामुळे धान पिकाला अपेक्षीत असे पोषक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे धानावर येणाºया बहुतेक सर्वच प्रकारच्या रोगाने तोंडवर काढले असून दर आठ-दहा दिवसात वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. धान परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच विविध रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले पीक नष्ट होण्याची भीती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे. पाने गुंडाळणारी अळी, खोड कीडा, मावा, तुडतुडा, मानमोडी यासारखे असंख्य रोग धानावर येत असल्याने कृषी विभागही हतबल झाला आहे. तर औषधांची फवारणी करता करता शेतकरीही तंगून गेले आहेत. आसोलामेंढा तलाव आणि गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर शेतकºयांनी मोठ्या आशेने रोवणी आटोपली. प्रसंगी खासगी कर्ज व उसनवार घेऊन रोवण्याचे काम केले. मात्र धानाला विविध रोगाने पछाडल्याने शेतकºयांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना न्याय देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.