शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

ताडोबातील ५०० बेरोजगारांना मिळणार कायमस्वरुपी रोजगार

By admin | Updated: April 5, 2017 00:40 IST

निसर्गाने ताडोबाच्या रुपाने आमच्याजवळ मोठी नैसर्गिक संपत्ती दिली आहे. ताडोबा केवळ महाराष्ट्रापर्यंतच नाव न राहता आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र होत आहे.

विविध प्रकल्पाचे मुनगंटीवारांच्या हस्ते लोकार्पण : ताडोबा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र होणारचंद्रपूर : निसर्गाने ताडोबाच्या रुपाने आमच्याजवळ मोठी नैसर्गिक संपत्ती दिली आहे. ताडोबा केवळ महाराष्ट्रापर्यंतच नाव न राहता आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र होत आहे. त्यामुळे या परिसरातील पुढच्या पिढीला जंगलाचे रक्षण व वाघाचे संरक्षण याचे प्रशिक्षण व आग्रह करण्याची गरजच भासू नये. त्यासाठी आगझरी येथे ताडोबा परिसरातील मुलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या कॅम्पिंग साईटमधून उद्याच्या ताडोबाचे प्रचारप्रसार करणारे व्याघ्रदूत निर्माण होतील, अशी आशा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ५०० लोकांना रोजगार मिळेल अशा विविध चार प्रकल्पाचे लोकार्पण केले. ताडोबा आगरझरी गावामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे सोमवारी कॅम्पिग साईट आगरझरी, देवाडा, जुनोना, अडेगांव येथील अगरबत्ती निर्मिती केंद्र आणि अडेगांव येथील बांबू वस्तू निर्मिती केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पातून जवळपास ५०० युवक-युवतींना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी. गरड, उपसंचालक जी. पी. नरवणे, उपसंचालक डॉ. के.एस.मानकर, परिविक्षाधिन सहायक वनसंरक्षक राहुल पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. एकाच व्यासपीठावरून त्यांनी विविध पाच प्रकल्पाचे लोकार्पण केले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधून महिला बचत गटांना बळकट करण्यात येणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याशिवाय या भागामध्ये पर्यटन वृध्दीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. बांबू वस्तु निर्मिती करताना स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन विविध साहित्य निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पातून सध्या युवकांना कायम स्वरुपी रोजगार मिळत आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारला या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅम्पिंग साईटला भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाशेजारी असणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षणामार्फत आपल्या वनसंपदेची माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध गटांना माहिती देण्यासाठी डिजिटल कार्यशाळा उभारण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: डिजिटल बोर्डाचा वापर करत स्वहस्ताक्षरात शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण केंद्रातून हरित सेनेच्या सदस्य वाढीसाठी मदत होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थितांना संबोधतांना ना मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून आपण शंभर धाडसी निर्णय घेतले असून याचा फायदा मोठया प्रमाणात जंगलाशेजारी गावाकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कुंपण योजना, जनावरांच्या हल्ल्यातील ठार झालेल्या गुरांसाठी वाढीव मोबदला, वन अकादमी, बांबू प्रशिक्षण केंद्र या सगळया निर्णयांच्या माध्यमातून जंगलाशेजारी नागरिकांचे जंगल संपदेवरचे अंवलंबित्व कमी व्हावे, हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आता यापुढे महिलांना इंधनासाठी जंगलात जाऊन लाकूडफाटा आणायची गरज भासणार नाही.या दिवाळीपर्यंत परिसरातील सगळया महिलांना मोफत गॅस मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावे, असे त्यांनी आवाहन केले. गरिबांना साहनुभूती दाखविणे, मदत करणे यापेक्षा त्यांना आत्मनिर्भर करणे सर्वात महत्वाचे असून त्यासाठी आपण झटत असून या परिसरातील पुढच्या पिढीला जंगलाचे महत्व सांगावे लागणार नाही. हा व्याघ्र प्रकल्पच आणि येथील वनसंपदा जनतेसाठी रोजगाराचे साधन होईल, अशी शाश्वतीही त्यांनी यावेळी दिली.