शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

रब्बी हंगामातील पीक कर्जाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक मिळाल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा ...

हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक मिळाल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार वाटतो. यंदा राजुरा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल तालुक्यात कडधान्य लागवडीचे हेक्टरी प्रमाण वाढले. ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, सिंदेवाही तालुका भात उत्पादक आहे. मात्र, अनेक शेतकरी आता अपारंपरिक नगदी पिकांकडे वळत आहेत. गतवर्षी खरीप हंगामामध्ये सर्व बँकांमार्फत कर्ज वाटप करण्याबाबतची कार्यवाही दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांशी संपर्क साधून अर्ज सादर करणे व अन्य प्रक्रिया तातडीने पूर्ण केली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, कोरोनामुळे यंदा रब्बी पीक कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

बँकांना गाठता आले नाही उद्दिष्ट

जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नेमणूक करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी तपासली. याशिवाय बँकेकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कारणांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खात्री केली़ कर्ज देताना येणाऱ्या अडचणींना तत्काळ सोडविण्याची सूचनाही दिली. त्यामुळे महसूल व अन्य विभागांकडून बँकेला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली. गतवर्षी वेळेवर पीक कर्ज मिळल्याने अडचणी दूर झाल्या. यंदा कोरोनाच्या सावटात जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबविली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील कर्जाचे उद्दिष्ट बँकांना गाठता आले नाही. बँकनिहाय कर्ज वितरणाची माहिती प्रशासनानेही अद्याप जाहीर केली नाही.