शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

बेरोजगार मजुरांना मिरची सातऱ्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:19 IST

गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

ठळक मुद्देनागभीड तालुका : शेकडो मजूर कामावर

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र नागभीड तालुक्यातील शेकडो मजुरांना मिरची सातऱ्यांचा रोजगारासाठी आधार मिळाला आहे.नागभीड तालुक्यात मिरची कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणावर मिरची सातरे थाटण्यात आले असून या सातºयावर शेकडो मजूर काम करीत आहेत. तालुक्यात किमान १० ते १५ गावात मिरची सातरे असून एका सातºयावर १५० ते २०० मजूर असे जवळपास तीन हजार मजुरांना काम मिळाला आहे. नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून असते. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अवकृपेने तालुक्याची अर्थव्यवस्था पार डबघाईस आली आहे. परिणामी येथील मजूर वर्गास कामाच्या शोधात दुसºया जिल्ह्यात स्थलांतर करावे लागत आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून आंध्र प्रदेशातील मिरची कंत्राटदारांनी नागभीड तालुक्यात मिरची साफ करण्यासाठी सातरे सुरू केले. अगोदर त्यांनी हा प्रयोग मोहाळी-बाम्हणी येथे केला. या सातºयांना मिळालेला मजुरांचा प्रतिसाद लक्षात घेता, ज्या ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत आहेत, त्या त्या ठिकाणी मिरची सातरे सुरू करण्यात आले आहेत .सद्यास्थितीत कानपा, मोहाळी, बाम्हणी, नवखळा, नवेगाव, मौशी, ओवाळा, वाढोणा, पळसगाव, चिचाळा या ठिकाणी मिरची सातरे सुरु आहेत. यातील काही ठिकाणी मजुरांची उपलब्धता लक्षात घेवून दोन दोन सातरे सुरू करण्यात आले आहेत. ही मिरची जवळच असलेल्या भिवापूर येथील असावी, असा लोकांचा समज आहे. मात्र हा समज चुकीचा असून ही मिरची आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिरचीच्या कांड्या काढून ती साफ झाल्यानंतर ही मिरची विदेशात निर्यात करण्यात येते, अशी माहिती आहे. मिरची साफ करण्यासाठी मजुरांना प्रती बोरीमागे विशिष्ट रक्कम दिली जाते. शारिरिकदृष्या हे काम घातक असले तरी हे काम केल्याशिवाय मजुरांसमोर अन्य पर्याय नसल्याने शेकडो मजूर येथे काम करीत आहेत.