शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जनतेचे मिशन जनतेने पूर्ण केले

By admin | Updated: July 8, 2016 00:46 IST

एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे,

सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्राचे वृक्षचळवळीत लक्षणीय पाऊल चंद्रपूर : एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे, असे प्रसंशोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्यात झालेल्या दोन कोटी वृक्षलागवडीसंदर्भात पत्रकारांशी ते बोलत होते.संपूर्ण राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झालेल्या या मोहिमेवर ना. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे जनतेचे मिशन होते. ते यशस्वी करताना पक्षभेद विसरून सर्वजण पुढे आले, हे महत्वाचे आहे. नागरिकांनी उत्सफुर्तपणे वृक्षारोपण केले. स्वत:च्या पैशाने रोपे विकत घेवून लावली. अनेक संस्था या कामी स्वत:हून पुढे आल्या आणि त्यांनी वृक्षारोपणातील आपले उद्दीष्ट पूर्ण केले. जनतेचा हा सहभागच लावलेली रोपे जगविण्यासाठी महत्वाचा ठरेल. लावलेली रोपे अधिक प्रमाणावर जगविणे हे यापुढील कर्तव्य आहे. जसे वनविभागाचे तसे प्रत्येक नागरिकाचेही ते कर्तव्य ठरणार आहे. या दोन कोटी वृक्षारोपणाच्या कार्यात अनेक संस्था, संघटना पुढे आल्याचे सांगून ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वनविभागाच्या विविध योजना आणि वृक्षारोपणासाठी दोन हजार कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. नरेगामध्येही निधी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनही या कामी निधी घेण्याची तयारी सुरू आहे. एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावून महाराष्ट्राने नवा इतिहास मांडला आहे. या कामाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेतली जात आहे. राज्यात पुढील काळात ५० कोटी वृक्ष लावण्याची सरकारची योजना आहे. त्या दृष्टीने सर्व माहिती संकलित करून युनोकडे पाठविण्याच्या तयारीत सरकार आहे. एक वेबसाईड तयार करून त्यावर सर्व माहिती संकलित केली जात आहे. त्यांच्याकडून या कामी मदत मिळविण्याच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) वनमंत्र्यांचे मन हरविले गर्द आमराईत ४० रूपये किलोच्या दराने देशी आंब्याच्या कोई खरेदी करण्याचा उपक्रम यंदा चंद्रपूरच्या वनविभागाने राबविला होता. यातून ४०० किलो देशी आंब्याच्या कोई सहज जमा झाल्यात. हे सांगताना वनमंत्री मुनगंटीवारांचे मन गर्द हिरव्या आमराईत हरविले. ते म्हणाले, अत्यल्प दरात कोई विकत घेवूनही या योजनेला यश मिळाले. या यशाचा अंदाज आधीच आला असता तर, ही योजना राज्यात राबविली असती. आपण प्रवासात असतो तेव्हा शेतशिवारावरील गर्द हिरवी आमराई दिसली की मन प्रसन्न होते. एखाद्या गावात अशी आमराई दिसली की मन हरखून जाते.