शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे मिशन जनतेने पूर्ण केले

By admin | Updated: July 8, 2016 00:46 IST

एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे,

सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्राचे वृक्षचळवळीत लक्षणीय पाऊल चंद्रपूर : एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे, असे प्रसंशोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्यात झालेल्या दोन कोटी वृक्षलागवडीसंदर्भात पत्रकारांशी ते बोलत होते.संपूर्ण राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झालेल्या या मोहिमेवर ना. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे जनतेचे मिशन होते. ते यशस्वी करताना पक्षभेद विसरून सर्वजण पुढे आले, हे महत्वाचे आहे. नागरिकांनी उत्सफुर्तपणे वृक्षारोपण केले. स्वत:च्या पैशाने रोपे विकत घेवून लावली. अनेक संस्था या कामी स्वत:हून पुढे आल्या आणि त्यांनी वृक्षारोपणातील आपले उद्दीष्ट पूर्ण केले. जनतेचा हा सहभागच लावलेली रोपे जगविण्यासाठी महत्वाचा ठरेल. लावलेली रोपे अधिक प्रमाणावर जगविणे हे यापुढील कर्तव्य आहे. जसे वनविभागाचे तसे प्रत्येक नागरिकाचेही ते कर्तव्य ठरणार आहे. या दोन कोटी वृक्षारोपणाच्या कार्यात अनेक संस्था, संघटना पुढे आल्याचे सांगून ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वनविभागाच्या विविध योजना आणि वृक्षारोपणासाठी दोन हजार कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. नरेगामध्येही निधी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनही या कामी निधी घेण्याची तयारी सुरू आहे. एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावून महाराष्ट्राने नवा इतिहास मांडला आहे. या कामाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेतली जात आहे. राज्यात पुढील काळात ५० कोटी वृक्ष लावण्याची सरकारची योजना आहे. त्या दृष्टीने सर्व माहिती संकलित करून युनोकडे पाठविण्याच्या तयारीत सरकार आहे. एक वेबसाईड तयार करून त्यावर सर्व माहिती संकलित केली जात आहे. त्यांच्याकडून या कामी मदत मिळविण्याच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) वनमंत्र्यांचे मन हरविले गर्द आमराईत ४० रूपये किलोच्या दराने देशी आंब्याच्या कोई खरेदी करण्याचा उपक्रम यंदा चंद्रपूरच्या वनविभागाने राबविला होता. यातून ४०० किलो देशी आंब्याच्या कोई सहज जमा झाल्यात. हे सांगताना वनमंत्री मुनगंटीवारांचे मन गर्द हिरव्या आमराईत हरविले. ते म्हणाले, अत्यल्प दरात कोई विकत घेवूनही या योजनेला यश मिळाले. या यशाचा अंदाज आधीच आला असता तर, ही योजना राज्यात राबविली असती. आपण प्रवासात असतो तेव्हा शेतशिवारावरील गर्द हिरवी आमराई दिसली की मन प्रसन्न होते. एखाद्या गावात अशी आमराई दिसली की मन हरखून जाते.