शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

जनतेचे मिशन जनतेने पूर्ण केले

By admin | Updated: July 8, 2016 00:46 IST

एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे,

सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्राचे वृक्षचळवळीत लक्षणीय पाऊल चंद्रपूर : एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे, असे प्रसंशोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्यात झालेल्या दोन कोटी वृक्षलागवडीसंदर्भात पत्रकारांशी ते बोलत होते.संपूर्ण राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झालेल्या या मोहिमेवर ना. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे जनतेचे मिशन होते. ते यशस्वी करताना पक्षभेद विसरून सर्वजण पुढे आले, हे महत्वाचे आहे. नागरिकांनी उत्सफुर्तपणे वृक्षारोपण केले. स्वत:च्या पैशाने रोपे विकत घेवून लावली. अनेक संस्था या कामी स्वत:हून पुढे आल्या आणि त्यांनी वृक्षारोपणातील आपले उद्दीष्ट पूर्ण केले. जनतेचा हा सहभागच लावलेली रोपे जगविण्यासाठी महत्वाचा ठरेल. लावलेली रोपे अधिक प्रमाणावर जगविणे हे यापुढील कर्तव्य आहे. जसे वनविभागाचे तसे प्रत्येक नागरिकाचेही ते कर्तव्य ठरणार आहे. या दोन कोटी वृक्षारोपणाच्या कार्यात अनेक संस्था, संघटना पुढे आल्याचे सांगून ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वनविभागाच्या विविध योजना आणि वृक्षारोपणासाठी दोन हजार कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. नरेगामध्येही निधी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनही या कामी निधी घेण्याची तयारी सुरू आहे. एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावून महाराष्ट्राने नवा इतिहास मांडला आहे. या कामाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेतली जात आहे. राज्यात पुढील काळात ५० कोटी वृक्ष लावण्याची सरकारची योजना आहे. त्या दृष्टीने सर्व माहिती संकलित करून युनोकडे पाठविण्याच्या तयारीत सरकार आहे. एक वेबसाईड तयार करून त्यावर सर्व माहिती संकलित केली जात आहे. त्यांच्याकडून या कामी मदत मिळविण्याच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) वनमंत्र्यांचे मन हरविले गर्द आमराईत ४० रूपये किलोच्या दराने देशी आंब्याच्या कोई खरेदी करण्याचा उपक्रम यंदा चंद्रपूरच्या वनविभागाने राबविला होता. यातून ४०० किलो देशी आंब्याच्या कोई सहज जमा झाल्यात. हे सांगताना वनमंत्री मुनगंटीवारांचे मन गर्द हिरव्या आमराईत हरविले. ते म्हणाले, अत्यल्प दरात कोई विकत घेवूनही या योजनेला यश मिळाले. या यशाचा अंदाज आधीच आला असता तर, ही योजना राज्यात राबविली असती. आपण प्रवासात असतो तेव्हा शेतशिवारावरील गर्द हिरवी आमराई दिसली की मन प्रसन्न होते. एखाद्या गावात अशी आमराई दिसली की मन हरखून जाते.