शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातरी येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर लोक प्रबोधन

By admin | Updated: June 17, 2016 01:11 IST

राजुरा येथून जवळच असलेल्या सातरी येथे ग्रामस्तरीय आदर्श गाव समिती व गुरुदेव सामाजिक सेवा मंडळ सिंधी यांच्या संयुक्त विद्यमाने

भरगच्च उपस्थिती : सातरी हे आदर्श गावसास्ती: राजुरा येथून जवळच असलेल्या सातरी येथे ग्रामस्तरीय आदर्श गाव समिती व गुरुदेव सामाजिक सेवा मंडळ सिंधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श गाव योजने अंतर्गत सप्तसुत्री अमंलबजावणीकरिता अंधश्रद्धा निर्मूलन व लोक सहभागाचे महत्व या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रबोधनकार सप्त खंजेरीवादक भाऊ थुटे यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रबोधनकार भाऊ थुटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा समिती राजुराचे माजी सभापती आबाजी पा. ढुमणे, राजुरा तालुका गुरुदेव सेवा मंडळचे संघटक अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, ग्रामपंचायतीचे सरपंच योगीता मून, उपसरपंच मारोती मोरे, पोलीस पाटील विजय पारशिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप कार्लेकर, पुंडलिक वडस्कर, मारोतराव कार्लेकर, दयाराम मून, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर धुर्वे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव श्रीधर पा. झुरमुरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.राजुरा तालुक्यातील सातरी या गावाची १९ जून २०१५ रोजी आदर्श गाव राज्य स्तरीय समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली व सातरी गावाची निवड आदर्श गाव योजनेमध्ये झाली. तेव्हापासून या गावात सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, लोटा बंदी, सराई बंदी, बोअरवेल बंदी, नसबंदी व श्रमदान या सप्तसूत्री अन्वये गावकऱ्यांच्या सहभागातून अंमलबजावणी सुरु आहे. या गावाच्या जलसंधारणाच्या व इतर विकास कामाकरिता पहिल्या टप्प्यात १ कोटी १९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून विविध विकास कामे सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम गितेचा प्रचार व प्रसार तसेच लोकसहभागाचे महत्व पटवून देण्याकरिता प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मारोती मोरे, संचालन मोते गुरुजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार भोयर गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)