शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

चंद्रपूरच्या जनतेने नेहमीच प्रोत्साहित केले

By admin | Updated: July 3, 2017 00:53 IST

वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला. पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून...

सुधीर मुनगंटीवार : दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात १० लाखांवर वृक्ष लावगडलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला. पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून हे व्रत पूर्ण करताना चंद्रपूरच्या जनतेने विक्रमी वृक्षलागवड करुन दरवर्षी मला काम करायला प्रोत्साहित केले आहे. या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र आत्मियतेने तुम्ही लावलेली वृक्ष देशाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रविवारी येथे केले.शनिवारी ऐरोली येथे वनमहोत्सव २०१७ चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी ज्या प्रदेशाने ना. सुधीर मुनगंटीवार यांना प्रेरणा दिली, त्या त्यांच्या चंद्रपूर जिल्हयात वनमहोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात ते रविवारी सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या विक्रमी उपस्थितीत प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. वनमहोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी वनविभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १० लाख २० हजार ९२ वृक्ष लागवडीची सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंद झाली. या १० लाख वृक्षलागवडीची वाटचाल ही विक्रमाकडे होत असून चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक वृक्षलागवड करणारा जिल्हा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्हयाने माझ्या प्रत्येक मोहिमेला भरभरुन पाठबळ दिले असून आज तर विद्यार्थीसुध्दा मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी भावनिक होत आभार मानले. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आणि सपना मुनगंटीवार उपस्थित होत्या. सेंट मायकल शाळेतील शेकडो विद्यार्थी व चंद्रपुरातील मान्यवरांच्या उपस्थितीत वनमंत्र्यांनी येथे वृक्षारोपण केले.वसुंधरेला हिरवेकंच करण्याचा संकल्पतासभर चाललेल्या शिस्तबध्द वृक्षारोपणानंतर उपस्थित जनसमुदयाला संबोधित करताना ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयात वनविभाग, वनविकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ शासकीय काम न समजता सुरु केलेल्या वृक्षलागवडीने आपण दिपून गेल्याचे स्पष्ट केले. वसुंधरेला हिरवेकंच्च करण्याचा आपला संकल्प असून हे पुण्याचे काम आहे, असेही म्हणाले. केवळ शासकीय काम न समजता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून देत यावेळी नियोजन केले असून त्यांच्यामुळेच जिल्हा विक्रमी वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण सिनेसृष्टी या जनउपयोगी कार्यात सहभागी झाली आहे. शेकडो लोक रोज हरीत सेनेचे सदस्य बनत असल्याचेही त्यांनी सांगितले.वनमहोत्सव यशस्वी होईल- ना. अहीरयावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुक्ष्म नियोजनातून यंदाचा हा वनमहोत्सव यशस्वी होईल, असे ते यावेळी म्हणाले. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी यावेळी वनविभागाच्या वेबसाईडवर जाऊन वृक्षलागवडीच्या संदर्भातील माहिती घ्यावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या ठिकाणी दर मिनिटाला माहिती अपलोड होत असून चंद्रपूरमध्ये वनविभागाने एकटयाने सायंकाळपर्यंत ७ लाख ७८ हजार ५३९ वृक्षलागवड केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांनी २९ लाखांचे उद्दिष्ट दिले असले तरी हा जिल्हा विक्रमी ४० लाखांच्या वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.