शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

अंधारल्या रात्रीही पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:45 IST

एप्रिल महिन्यातच पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. गावातील विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. पाण्यासाठी गावोगावी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची उडाली झोप : निंबाळावासीयांची पाण्यासाठी भटकंती

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : एप्रिल महिन्यातच पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. गावातील विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. पाण्यासाठी गावोगावी भटकंती सुरू आहे. राजुरा तालुक्यातील निंबाळावासीयांना तर मध्यरात्री उठून पाणी भरावे लागते आहे.राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले निंबाळा हे जेमतेम ६५० लोकसंख्या असलेले गाव. वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने कळमना (वाढई) ग्रामपंचायतीतून निंबाळा गावाचा कारभार चालतो. गावात दरवर्षीच पाणी टंचाई असते. परंतु यावर्षी पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. गावात दोन विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने त्या कोरड्या गेल्या आहेत. गावात एक सरकारी हातपंप आहे. मात्र पातळी खालावल्याने त्या हातपंपालाही पाणी येत नाही. अख्खे गावच एका हातपंपावर पाणी भरते. त्यासाठी महिलांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. या हातपंपाला पाणी येत नसल्याने पाण्याची साठवणूक होऊ द्यावी लागते. त्यानंतर रात्री २, ३ वाजता, जेव्हा डोळा उघडेल तेव्हा हातपंपावर जाऊन पाणी भरावे लागत आहे.निंबाळा गावात पाणीटंचाईमुळे गावकरी रात्रभर पाण्यासाठी भटकंती करतात, अशी माहिती मिळताच प्रस्तुत प्रतिनिधीने या गावाला भेट दिली. गावात गेल्यागेल्याच पाण्याची भिषण टंचाई निदर्शनास आली. गावात पाणीटंचाई असल्याने गावकरी मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी केविलवाणी धडपड करतात. काही नागरिक बैलबंडीवर ड्रम बांधून शेतात असलेल्या बोअरवेलवरुन पाणी आणत असल्याचे सांगण्यात आले. पण ज्यांच्याकडे पाणी आणण्याची कोणतीच सोय नाही, त्यांना पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते.प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट देऊन येथील महिलांची चर्चा केली असता तानेबाई मेश्राम ही वयोवृद्ध महिला म्हणाली, आमच्या गावात पाणी नाही. विहिरी आटल्या आहेत. हातपंपाला बरोबर पाणी येत नाही. त्यामुळे आम्हाला रात्रभर पाणी भरावे लागते, असे त्यांनी सांगितले. अर्चना झाडे, सुनंदा मेश्राम, अनिता बोरकर, ब्रिंदा कोंगरे, किरण कोंगरे, तानेबाई मेश्राम, सुनिता चुधरी, कुसूम मेश्राम, कलाबाई झाडे, वच्छला शिडाम, लता झाडे, सुनिता बोरकर, पार्वता मेश्राम, किरण मेश्राम, सोनी मेश्राम, रुपा बोरकर या सर्व महिला गावातील एकाच हातपंपावर पाणी भरताना दिसल्या. त्यांना बोलते केले असता त्या म्हणाल्या, गावात या हातपंपाशिवाय कुठेच पाणी मिळत नाही. आमचे गाव कळमना ग्रामपंचायतीत येत असल्याने सरपंच, उपसरपंच कळमना येथे राहतात. गावात पाण्याची बोंब असताना त्यांना याबाबत काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही.दोन किमीवरुन बैलबंडीने आणावे लागते पाणीनिंबाळा गावात पाणीटंचाई असल्याने येथील नागरिकांना नाईलाजाने दोन किमी अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलवरुन पाणी आणावे लागत आहे. गावातील महिला पाण्यासाठी पायपीट करीत असून नागरिकांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड केविलवाणी आहे.आमदारांनी लक्ष द्यावेगावात पाणीटंचाई असल्याने निंबाळा गावात पाणी मिळेणासे झाले आहे. अ‍ॅड. संजय धोटे या क्षेत्राचे आमदार असून त्यांनी गावकऱ्यांनी व्यथा जाणून घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी निंबाळावासीयांनी केली आहे.निंबाळा गावात गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी नळ योजना आहे. परंतु टाकीला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्याने नळ योजना प्रभावित झाली आहे. त्यामुळे निंबाळावासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.- प्रभाकर पाल,ग्रा.पं. सदस्य, निंबाळा