शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

पहाडावरील मजुरांचा उघड्यावर संसार

By admin | Updated: November 22, 2014 22:58 IST

पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून

जिवती : पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांनीे राहायचे कुठे? पोट भरायचे कसे? जगायचे कसे? संसार सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजूर काम मिळेल तिथे झोपड्या तयार करुन आपले वास्तव्य करतात. आपली आर्थिक बाजू बळकट व्हावी. यासाठी दिवसरात्र काम करून संसाराचा गाडा चालवितात. संसाराचा गाडा चालविताना मुलाबाळांचा साभाळं कोण करणार. त्यांना कोण शिकविणार म्हणून शाळेत शिकत असलेली बालकेही सोबतीला घेऊन जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. ना घर ना रस्ता, ना शिक्षण, ना वीज, ना आरोग्याच्या सोयी त्यांना मिळतात. हे सर्व विसरुन एखाद्या ठेकेदाराच्या आश्रयाखाली झोपड्या तयार करुन संसार करण्याची पाळी माणिगकड पहाडावरील मजुरांवर आली आहे. दरवर्षी होणारा निसर्गाचा कोप, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान यावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पहाडावर दलित आदिवासी, बंजारा समाज अधिक आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांनाच मजूर म्हणून राबण्याची पाळी आली आहे. एकीकडे शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे पोटाची खडगी भरण्यासाठी पालक आपल्या मुलाला सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मराठवाड्यातील लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, नांदेड आदी जिल्ह्यात मजुरांना ऊस तोडणीचे काम नियमित मिळत असून रोजीसुद्धा समाधानकारक मिळते. पेरणीपूर्व ठेकेदाराकडून पैसे घेणे आणि दिवाळीनंतर कामाला जाणे, हा त्यांचा हंगाम ठरलेला आहे. दिवसरात्र शेतात राबराब राबूनही हाती काहीच पडत नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.