शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील मजुरांचा उघड्यावर संसार

By admin | Updated: November 22, 2014 22:58 IST

पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून

जिवती : पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांनीे राहायचे कुठे? पोट भरायचे कसे? जगायचे कसे? संसार सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजूर काम मिळेल तिथे झोपड्या तयार करुन आपले वास्तव्य करतात. आपली आर्थिक बाजू बळकट व्हावी. यासाठी दिवसरात्र काम करून संसाराचा गाडा चालवितात. संसाराचा गाडा चालविताना मुलाबाळांचा साभाळं कोण करणार. त्यांना कोण शिकविणार म्हणून शाळेत शिकत असलेली बालकेही सोबतीला घेऊन जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. ना घर ना रस्ता, ना शिक्षण, ना वीज, ना आरोग्याच्या सोयी त्यांना मिळतात. हे सर्व विसरुन एखाद्या ठेकेदाराच्या आश्रयाखाली झोपड्या तयार करुन संसार करण्याची पाळी माणिगकड पहाडावरील मजुरांवर आली आहे. दरवर्षी होणारा निसर्गाचा कोप, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान यावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पहाडावर दलित आदिवासी, बंजारा समाज अधिक आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांनाच मजूर म्हणून राबण्याची पाळी आली आहे. एकीकडे शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे पोटाची खडगी भरण्यासाठी पालक आपल्या मुलाला सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मराठवाड्यातील लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, नांदेड आदी जिल्ह्यात मजुरांना ऊस तोडणीचे काम नियमित मिळत असून रोजीसुद्धा समाधानकारक मिळते. पेरणीपूर्व ठेकेदाराकडून पैसे घेणे आणि दिवाळीनंतर कामाला जाणे, हा त्यांचा हंगाम ठरलेला आहे. दिवसरात्र शेतात राबराब राबूनही हाती काहीच पडत नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.