शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

पहाडावरील मजुरांचा उघड्यावर संसार

By admin | Updated: November 22, 2014 22:58 IST

पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून

जिवती : पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांनीे राहायचे कुठे? पोट भरायचे कसे? जगायचे कसे? संसार सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजूर काम मिळेल तिथे झोपड्या तयार करुन आपले वास्तव्य करतात. आपली आर्थिक बाजू बळकट व्हावी. यासाठी दिवसरात्र काम करून संसाराचा गाडा चालवितात. संसाराचा गाडा चालविताना मुलाबाळांचा साभाळं कोण करणार. त्यांना कोण शिकविणार म्हणून शाळेत शिकत असलेली बालकेही सोबतीला घेऊन जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. ना घर ना रस्ता, ना शिक्षण, ना वीज, ना आरोग्याच्या सोयी त्यांना मिळतात. हे सर्व विसरुन एखाद्या ठेकेदाराच्या आश्रयाखाली झोपड्या तयार करुन संसार करण्याची पाळी माणिगकड पहाडावरील मजुरांवर आली आहे. दरवर्षी होणारा निसर्गाचा कोप, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान यावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पहाडावर दलित आदिवासी, बंजारा समाज अधिक आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांनाच मजूर म्हणून राबण्याची पाळी आली आहे. एकीकडे शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे पोटाची खडगी भरण्यासाठी पालक आपल्या मुलाला सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मराठवाड्यातील लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, नांदेड आदी जिल्ह्यात मजुरांना ऊस तोडणीचे काम नियमित मिळत असून रोजीसुद्धा समाधानकारक मिळते. पेरणीपूर्व ठेकेदाराकडून पैसे घेणे आणि दिवाळीनंतर कामाला जाणे, हा त्यांचा हंगाम ठरलेला आहे. दिवसरात्र शेतात राबराब राबूनही हाती काहीच पडत नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.