शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण

By admin | Updated: April 9, 2015 01:21 IST

१ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. प्रारंभीच्या काळात अट्टल मद्यपींची मोठी पंचाईत झाली.

पेंढरी (कोके) : १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. प्रारंभीच्या काळात अट्टल मद्यपींची मोठी पंचाईत झाली. मात्र नंतर त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आल्याने ते सावरू लागले आहेत. विशेष म्हणजे, दारुबंदीमुळे गावागावात शांततेचे वातावरण दिसून येत असून भांडणतंट्यांना आळा बसला आहे. एरव्ही गजबजलेल्या बाजारातील गर्दी मात्र ओसरल्याचे दिसून येत आहे. श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या परिश्रमातून महिला व गुरुदेव सेवा मंडळाच्या सहकार्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारू-बिअरबारचे लायसन्स रद्द करून दारूबंदी केली. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. सदर वार्ताहराने नेरी-नवरगाव- पेंढरी भागात फेरफटका मारला असता ३१ मार्चला शेवटच्या दिवशी देशीदारू बिअरबारमध्ये अफाट गर्दी आढळली. काही मद्यपींना विचारले असता रांगेत राहून सिनेमाची तिकीट घेतल्यासारखे दारूचे पव्वे दाम दुप्पट भावाने तेही सोबत पार्सल म्हणून घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर आतापर्यंत या गावात शांतता नांदत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नेरी-नवरगाव बाजारात कित्येक वर्षापासून दारू-मटन व बाजार खरेदीसाठी येणाऱ्या पुरुषांची संख्या रोडावली असल्याचे निदर्शनास येत आहे. बाजारात पुरुषापेक्षा स्त्रियांचीच संख्या अधिक दिसत आहे. इतकेच नाहीतर बाजारातून एखादे वाहन खुलेआम चालवून घ्यावे, अशी कधी नव्हे एवढी मोकळी जागा बाजारात दिसून येत आहे.गावातील चौक, रस्ते, व कार्यक्रमातही शांतता पसरली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत जाणकारांचे मत घेतले असता आमच्या इतक्या वर्षात एवढे रिकामे रस्ते व शांतता कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. तसेच या दारूबंदीमुळे व्यवसायिक म्हणाले, नाश्ता, चने-फुटाणे, उकळले अंडे, खर्रे पान खाणाऱ्यांची संख्याही कमी झालेली आहे. हे पदार्थ खाणारे एकच प्यालातील सुधाकररूपी मद्यपी आता साधे ढुंकूनसुद्धा पाहत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यावर व कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मांस खाणाऱ्याचेसुद्धा प्रमाण कमी होईल. सध्या लग्न, वाढदिवस व इतर समारंभाचे दिवस आहेत. परंतु मदिराच नसल्याने ढोल-ताशा संदलच्या तालावर नाचणारे ‘तळीराम’ही नाचण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे नवरदेव - नवरीच्या वऱ्हातीला शोभाच दिसत नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे वऱ्हातीला शोभा येण्यासाठी कित्येक ठिकाणी बच्चे कंपनी व महिला मंडळी नाचताना दिसत आहेत. वाद्याचा खर्च काढावा, यासाठीही काही ठिकाणी नाचगाणे होत आहेत. एकंदरीत दारूबंदीचा सर्वदूर परिणाम झालेला दिसून येत आहे. काही बाबतीत याचा विपरित परिणाम दिसून येत असेल, तरीही ही बाब चंद्रपूर जिल्ह्यात नक्कीच स्वागतार्ह आहे. दारूबंदीमुळे शासकीय कामातही मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)दारूबंदीमुळे संदर्भच बदललेचिरोली : चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या अंमलबजावणीमुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे दारू दुकान उघडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालत राहणारी वर्दळ बंद झाली आहे. गावातील एकमेव असलेल्या देशी दारूच्या दुकानावर पुरक व्यवसाय म्हणून चने-फुटाणे, पाणी पाऊच, पानठेले, भाजीपाला, मटन, मच्छी विक्रेते उपजिविका करीत होते. त्यांना घरी बसावे लागले आहे. तसेच परिसरातील गावागावातून दारूचे शौकीन सकाळपासून रात्रीपर्यंत येणे जाणे करून दुकानात व गावातही हजेरी लाावत असत. मित्र-मंडळी गप्पा गोष्टी, चौकाचौकात रस्त्या-रस्त्यावर भांडण-तंटे, मारामाऱ्या, वादविवाद यामुळे परिसर गजबजून जात असे. दिवसभर कष्ट करून विरंगुळा करणारे तसेच रिकामटेकडे हे त्यानिमित्य दुकानावर येत असत. तळीरामांच्या करमणुकीचे हे एकमेव साधन बंद झाल्याने येणारे जाणारे घरीच राहताना दिसून येत आहेत. यापूर्वी रात्री उशिरा रस्यांवरून वाहनांची राहणारी वर्दळही बंद झाली आहे.