शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:00 IST

एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर हीच स्थिती : जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूरकडे धाव

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. अशातच राज्य सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याची अट ठेवल्याने दुर्गम भागातील शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यासाठी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिवती व कोरपना तालुक्यातील या गंभीर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ही अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूर येथील इंटरनेट कॅफेमध्ये रिघ लागली आहे. लिंक नसल्यामुळे वेबसाईट दिवसभर बंद असते. अशावेळी ताटकळत वाट बघण्यापेक्षा गावाकडे जाऊन पुन्हा दुसºया दिवशी परत यावे लागते. शेतकºयांना कॅफेमध्ये आपला नंबर लावायचा झाल्यास सकाळचे जेवण न करता पहाटेच वाहन पकडून गडचांदूर गाठावे लागते. जिवती तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील शेतकरी रोज ये-जा करीत आहे. मात्र वाट बघूनही अर्ज न भरल्याने त्यांना फार मानसिक त्रास होत आहे. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या भानगडीत अनेक शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.महिला शेतकºयांचीही गर्दीज्यांच्या नावाने शेतजमीन आहे, त्यांनाच अर्ज भरता येतो. सातबारा ज्यांच्या नावे आहे, त्यांचा अंगठ्याचा ठसा आॅनलाईन घेतल्याशिवाय अर्ज अधिकृत होत नाही. कारण शेतकºयाची खरी माहिती पटावी, यासाठी आधार लिंक असल्याने बोटाचा ठसा महत्वाचा झाला आहे. शेतजमीन नावावर असणाºया अनेक शेतकरी महिलासुद्धा आहे. त्यामुळे महिलांना घरकामे सोडून दोन-तीन दिवस पूर्णवेळ खर्च करावे लागत आहे.आमच्या जिवती तालुक्यात इंटरनेट बरोबर नसल्याने मी गडचांदूरला येऊन अर्ज भरीत आहो. सर्व कागदपत्रे घेऊन वाट बघत आहो. पण नंबरच लागत नाही. पुढच्या शेतकºयाला विचारल्यास लिंक नाही म्हणून सांगण्यात येते. असे करता-करता पाच दिवस झाले. पण अजूनही अर्ज भरला नाही. कामधंदे सोडून ४५ किलोमीटर दुरून आल्यानंतर काम होत नाही.- अंगद शिवराज ठोंबरे, नारपठारयाअगोदर पण कर्जमाफी झाली होती. तेव्हा आम्ही बँकेत न जाता बँकेचे कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि अर्ज भरायचे. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. आता आमचा त्रास वाढला आहे. शेतातील कामे सोडून आम्ही रोज अर्ज भरायला येत आहो. तरी पण अर्ज भरल्या जात नाही आहे. काय करावे काहीच समजत नाही.-पांडुरंग साधू सूर्यवंशी,मरकलमेटाजनतेला रांगेत उभे करण्याचे धोरणज्याप्रमाणे नोटाबंदी करून मोदी सरकारने देशातील जनतेला रांगेत उभे केले. तसेच फसवी कर्जमाफी करून राज्यातील फडणवीस सरकारने गरीब शेतकºयांना रांगेत उभे केले. जनतेला रांगेत उभे करून त्रास देण्याचे भाजपा सरकारचे धोरण आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेट पोहचले नसल्याने शेतकरी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीे. शेतातली कामे सोडून ४-५ दिवस शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. कोणतीही अट न ठेवता शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- सुभाष धोटे, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस