शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:22 IST

कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरांची मागणी। ग्रामसभांनीही घेतला सावध पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहे. परंतु, ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास मजुरी व रॉयल्टी देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकदा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीवर पाणी फेरावे लागले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मात्र कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजूरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर असतो. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.गतवर्षी कंत्राटदारांनी रायल्टी बुडविली होती. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे धाबा, गोंडपिपरी परिसरातील कंत्राटदारांची गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा व्यावहारीक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येते.खरीप हंगामासाठी पैशाची गरजजिल्ह्यातील चार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यातील काही गावांचे तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्ता वाहतुकीला सुरुवात झाली आहे. यातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग