शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:22 IST

कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरांची मागणी। ग्रामसभांनीही घेतला सावध पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहे. परंतु, ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास मजुरी व रॉयल्टी देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकदा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीवर पाणी फेरावे लागले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मात्र कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजूरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर असतो. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.गतवर्षी कंत्राटदारांनी रायल्टी बुडविली होती. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे धाबा, गोंडपिपरी परिसरातील कंत्राटदारांची गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा व्यावहारीक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येते.खरीप हंगामासाठी पैशाची गरजजिल्ह्यातील चार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यातील काही गावांचे तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्ता वाहतुकीला सुरुवात झाली आहे. यातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग