शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:22 IST

कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरांची मागणी। ग्रामसभांनीही घेतला सावध पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहे. परंतु, ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास मजुरी व रॉयल्टी देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकदा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीवर पाणी फेरावे लागले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मात्र कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजूरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर असतो. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.गतवर्षी कंत्राटदारांनी रायल्टी बुडविली होती. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे धाबा, गोंडपिपरी परिसरातील कंत्राटदारांची गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा व्यावहारीक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येते.खरीप हंगामासाठी पैशाची गरजजिल्ह्यातील चार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यातील काही गावांचे तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्ता वाहतुकीला सुरुवात झाली आहे. यातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग