शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

बँकेत पोहोचलेल्या शेतकऱ्याला तातडीने कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : शेतकºयांची अडवणूक खपवून घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बुधवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना कठोर शब्दांमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित कर्जदार, अनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी गेल्या आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेकडून शंभर टक्के शेतकºयांना कर्ज वाटप झाले पाहिजे, हे लक्ष्य ठेवून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.राज्य शासनाने २०१८-१९ या वषार्साठी जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकºयांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांनी केले.या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकºयांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एकाचवेळी पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेनेकर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले.महसूल विभागाची मदत घ्यावीशेतकºयांनीदेखील कोणतीही बँक कर्ज देण्यामध्ये अडचण निर्माण करीत असेल, महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकºयांनी तालुका उपनिबंधक, तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना यावेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.