शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत पोहोचलेल्या शेतकऱ्याला तातडीने कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : शेतकºयांची अडवणूक खपवून घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बुधवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना कठोर शब्दांमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित कर्जदार, अनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी गेल्या आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेकडून शंभर टक्के शेतकºयांना कर्ज वाटप झाले पाहिजे, हे लक्ष्य ठेवून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.राज्य शासनाने २०१८-१९ या वषार्साठी जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकºयांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांनी केले.या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकºयांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एकाचवेळी पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेनेकर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले.महसूल विभागाची मदत घ्यावीशेतकºयांनीदेखील कोणतीही बँक कर्ज देण्यामध्ये अडचण निर्माण करीत असेल, महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकºयांनी तालुका उपनिबंधक, तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना यावेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.