शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

बँकेत पोहोचलेल्या शेतकऱ्याला तातडीने कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : शेतकºयांची अडवणूक खपवून घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बुधवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना कठोर शब्दांमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित कर्जदार, अनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी गेल्या आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेकडून शंभर टक्के शेतकºयांना कर्ज वाटप झाले पाहिजे, हे लक्ष्य ठेवून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.राज्य शासनाने २०१८-१९ या वषार्साठी जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकºयांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांनी केले.या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकºयांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एकाचवेळी पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेनेकर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले.महसूल विभागाची मदत घ्यावीशेतकºयांनीदेखील कोणतीही बँक कर्ज देण्यामध्ये अडचण निर्माण करीत असेल, महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकºयांनी तालुका उपनिबंधक, तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना यावेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.