शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

बँकेत पोहोचलेल्या शेतकऱ्याला तातडीने कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : शेतकºयांची अडवणूक खपवून घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बुधवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना कठोर शब्दांमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित कर्जदार, अनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी गेल्या आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेकडून शंभर टक्के शेतकºयांना कर्ज वाटप झाले पाहिजे, हे लक्ष्य ठेवून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.राज्य शासनाने २०१८-१९ या वषार्साठी जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकºयांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांनी केले.या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकºयांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एकाचवेळी पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेनेकर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले.महसूल विभागाची मदत घ्यावीशेतकºयांनीदेखील कोणतीही बँक कर्ज देण्यामध्ये अडचण निर्माण करीत असेल, महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकºयांनी तालुका उपनिबंधक, तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना यावेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.