शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

By राजेश भोजेकर | Updated: May 24, 2023 14:13 IST

विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात.

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता. मात्र त्यानंतरच्या काळात आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांना नियमान्वये लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अखेर सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांनी आधारभूत धान खरेदी बंद करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना दिले. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता सकारात्मक चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकर आदेश काढणार असल्याची प्रतिक्रिया दिल्याने रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले.

विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. धान पीक घेताना मशागत व लागवडी खर्च अधिक असतानाही धानाला रास्त भाव मिळत नाही. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची असून शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव व सोबत बोनस असा दुहेरी लाभ दिला. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक समस्या निकाली काढण्यासाठी मदत झाली. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र व उपअभिकर्तांना प्रती क्विंटल मागे अर्धा किलो तूट, संस्थेचे दहा लक्ष रुपये अनामत भरणे, तसेच ५० लक्ष रुपयांची बँक गॅरंटी अशा जाचक अटींच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा आधारभूत धान खरेदी संघटनेने आवाज उचलत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून जाचक अटी शिथिल करण्यासंबंधी मागणी घातली. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र द्वारे धान खरेदी होणार नसल्याचेही निवेदनातून व्यथा व्यक्त केली.

आधारभूत धान खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न केल्यास यातून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल व शेतकरी पूर्णतः उदध्वस्त होणार असा दूर दृष्टिकोनातून विचार करून माजी मंत्री वडेट्टीवार यांनी मुंबई गाठून राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांची समक्ष मांडल्या. यावर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक चर्चेतून सेवा सहकारी संस्था व उपअभि करता यांचेवर लादण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करून लवकरच आदर काढणार असल्याची प्रतिक्रिया पर माहिती दिली. यामुळे आगामी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच यासंबंधीचे आदेश निघणार आहेत. शेतकरी हितासाठी नेहमीच आ. विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून आजच्या हिरीरी व अथक प्रयत्नामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होणार हे विशेष.

टॅग्स :agricultureशेतीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदेchandrapur-acचंद्रपूर