शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांची हेळसांड

By admin | Updated: August 25, 2015 01:15 IST

सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय

मूल : सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय सुरू आहे. सध्या साथीचे रोग असल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांची चांगलीच हेळसांड होत असून संपात व्यक्त केला जात आहे.जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने मूल येथे ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय बांधण्यात आले. मात्र गेल्या १२ वर्षांपासून योग्य सेवा पुरविण्यास उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरला आहे. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे राहात असल्याने रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या स्थितीत नऊ पैकी तीन वैद्यकीय अधिकारी तर अधिपरिचारीका १२ पैकी चारच कार्यरत आहेत. बाह्य रुग्ण सेवेत सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ५ अशा वेळात रुग्णांची तपासणी करुन उपचार केला जातो. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेटलतिफपणामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. २४ आॅगस्टला प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारल्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची ड्युटी असताना, वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडे मात्र तब्बल पाऊन तासांनी म्हणजे ४ वाजून ४५ मिनीटांनी रुग्णालयात आले. तोपर्यंत पाऊन तास रुग्ण ताटकळत उभे दिसून आले. हिच स्थिती आंतर रुग्णात सुद्धा होती. रुग्णालयात बेडवर रुग्ण असताना देखील वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर आढळले नाही. एखाद्या वेळेस अनर्थ घडला तर वैद्यकीय सेवा मिळणार काय, असा प्रश्न जनतेनी केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास मूलचे उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरल्याचा आरोप होत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)