शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
5
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
8
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
9
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
10
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
12
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
13
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
14
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
15
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
16
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
17
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
18
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
19
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
20
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा

जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 13, 2015 00:05 IST

उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत.

चंद्रपूर : उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत. दिवसाढवळ्या जंगलातून कुठून ना कुठून धूर निघताना दिसतो, तर रात्रीच्यावेळी रोशनाई केल्यासारखे आगीचे दृश्य दिसते. हा वणवा नेहमीच वने व वन्यजीवनांच नव्हे तर जैवविविधतेला धोका निर्माण करणारा ठरत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या, असे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.चंद्रपू जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यातच येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदेखील आहे. यावर्षी ताडोबात मोठ्या प्रमाणावर आग लागली. त्यात वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तीव्रता जरी कमी असली तरी वणवा लागून वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. खाली पडलेल्या पालापाचोळ्यासोबत गवताचे हे इतर वनस्पतीचे बियाणे जळून खाक झाले. त्याचबरोबर लहान-लहान वनस्पती देखील नष्ट झाल्यात. एवढेच नव्हे तर गवतात राहणारे लावा, तितीर यासारख्या पक्ष्यासोंबतच असंख्य ससे, उंदीर यासारखे लहान-लहान व सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी देखील आगीचे भक्ष्य ठरले. तसेच जैवविविधतेला पूरक ठरणारे किटक देखील यातून सुटले नाहीत. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यदेखील जळून खाक झाले. वनव्यामुळे वनसंपदा नष्ट होते, जैवविविधतेला धोका निर्माण होतो, ही दरवर्षीचीच ओरड आहे. पण दरवर्षी वनवा लागतो, ही बाबही नित्याचीच झाली आहे. यावर कायमस्वरुपी उपायोजना मात्र शासनाला किंवा प्रशासनाला अजुनपर्यंत करता आल्या नाहीत. हे त्यांचे अपयश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तेंदुपत्ता, मोहफुले व डिंकासाठी जंगलात आग लावली जाते, हे वास्तव आहे. असे विघातक कृत्य करणारी माणसे जंगलालगतच्या गावामध्येच राहतात व अल्पश: कमाईसाठी संबंधित ठेकेदाराच्या आहारी जातात.परंतु हे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नाहीत. निसर्गचक्रामध्ये वने व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे, ही बाब आता पाठय पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जैवविविधतेच्या साखळीतील एखादी कडी जरी कमजोर झाली तरी त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. अशीच परिस्थिी राहिली तर जंगलातील प्राणी गावामध्ये व शेतामध्ये धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मानवाला वरदान ठरणाऱ्या विविध औषधी वनस्पतीदेखील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. (प्रतिनिधी)