शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 13, 2015 00:05 IST

उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत.

चंद्रपूर : उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत. दिवसाढवळ्या जंगलातून कुठून ना कुठून धूर निघताना दिसतो, तर रात्रीच्यावेळी रोशनाई केल्यासारखे आगीचे दृश्य दिसते. हा वणवा नेहमीच वने व वन्यजीवनांच नव्हे तर जैवविविधतेला धोका निर्माण करणारा ठरत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या, असे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.चंद्रपू जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यातच येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदेखील आहे. यावर्षी ताडोबात मोठ्या प्रमाणावर आग लागली. त्यात वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तीव्रता जरी कमी असली तरी वणवा लागून वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. खाली पडलेल्या पालापाचोळ्यासोबत गवताचे हे इतर वनस्पतीचे बियाणे जळून खाक झाले. त्याचबरोबर लहान-लहान वनस्पती देखील नष्ट झाल्यात. एवढेच नव्हे तर गवतात राहणारे लावा, तितीर यासारख्या पक्ष्यासोंबतच असंख्य ससे, उंदीर यासारखे लहान-लहान व सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी देखील आगीचे भक्ष्य ठरले. तसेच जैवविविधतेला पूरक ठरणारे किटक देखील यातून सुटले नाहीत. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यदेखील जळून खाक झाले. वनव्यामुळे वनसंपदा नष्ट होते, जैवविविधतेला धोका निर्माण होतो, ही दरवर्षीचीच ओरड आहे. पण दरवर्षी वनवा लागतो, ही बाबही नित्याचीच झाली आहे. यावर कायमस्वरुपी उपायोजना मात्र शासनाला किंवा प्रशासनाला अजुनपर्यंत करता आल्या नाहीत. हे त्यांचे अपयश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तेंदुपत्ता, मोहफुले व डिंकासाठी जंगलात आग लावली जाते, हे वास्तव आहे. असे विघातक कृत्य करणारी माणसे जंगलालगतच्या गावामध्येच राहतात व अल्पश: कमाईसाठी संबंधित ठेकेदाराच्या आहारी जातात.परंतु हे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नाहीत. निसर्गचक्रामध्ये वने व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे, ही बाब आता पाठय पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जैवविविधतेच्या साखळीतील एखादी कडी जरी कमजोर झाली तरी त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. अशीच परिस्थिी राहिली तर जंगलातील प्राणी गावामध्ये व शेतामध्ये धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मानवाला वरदान ठरणाऱ्या विविध औषधी वनस्पतीदेखील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. (प्रतिनिधी)