शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 13, 2015 00:05 IST

उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत.

चंद्रपूर : उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत. दिवसाढवळ्या जंगलातून कुठून ना कुठून धूर निघताना दिसतो, तर रात्रीच्यावेळी रोशनाई केल्यासारखे आगीचे दृश्य दिसते. हा वणवा नेहमीच वने व वन्यजीवनांच नव्हे तर जैवविविधतेला धोका निर्माण करणारा ठरत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या, असे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.चंद्रपू जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यातच येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदेखील आहे. यावर्षी ताडोबात मोठ्या प्रमाणावर आग लागली. त्यात वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तीव्रता जरी कमी असली तरी वणवा लागून वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. खाली पडलेल्या पालापाचोळ्यासोबत गवताचे हे इतर वनस्पतीचे बियाणे जळून खाक झाले. त्याचबरोबर लहान-लहान वनस्पती देखील नष्ट झाल्यात. एवढेच नव्हे तर गवतात राहणारे लावा, तितीर यासारख्या पक्ष्यासोंबतच असंख्य ससे, उंदीर यासारखे लहान-लहान व सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी देखील आगीचे भक्ष्य ठरले. तसेच जैवविविधतेला पूरक ठरणारे किटक देखील यातून सुटले नाहीत. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यदेखील जळून खाक झाले. वनव्यामुळे वनसंपदा नष्ट होते, जैवविविधतेला धोका निर्माण होतो, ही दरवर्षीचीच ओरड आहे. पण दरवर्षी वनवा लागतो, ही बाबही नित्याचीच झाली आहे. यावर कायमस्वरुपी उपायोजना मात्र शासनाला किंवा प्रशासनाला अजुनपर्यंत करता आल्या नाहीत. हे त्यांचे अपयश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तेंदुपत्ता, मोहफुले व डिंकासाठी जंगलात आग लावली जाते, हे वास्तव आहे. असे विघातक कृत्य करणारी माणसे जंगलालगतच्या गावामध्येच राहतात व अल्पश: कमाईसाठी संबंधित ठेकेदाराच्या आहारी जातात.परंतु हे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नाहीत. निसर्गचक्रामध्ये वने व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे, ही बाब आता पाठय पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जैवविविधतेच्या साखळीतील एखादी कडी जरी कमजोर झाली तरी त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. अशीच परिस्थिी राहिली तर जंगलातील प्राणी गावामध्ये व शेतामध्ये धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मानवाला वरदान ठरणाऱ्या विविध औषधी वनस्पतीदेखील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. (प्रतिनिधी)