शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी बनण्याचा मार्ग खडतर

By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST

शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत.

खडसंगी : शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुजी बनण्याचा मार्ग आता खडतर झाला आहे.शासनाने लादलेल्या या पाच परीक्षांना सामोरे जाताना भावी गुरुजींची चांगलीच दमछाक होत असून यामध्ये वेळ व पैसाचा प्रचंड अपव्यय होत आहे. दहा वर्षापूर्वी डीएड, बीएड उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण पदावर सरळ निवड करण्यात येत होती. आता शिक्षक होण्यासाठी पाच परीक्षेच्या चाळण्यामधून उमेदवारांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागत आहे.एमपीएससी, युपीएससीमार्फत प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या प्रमुख तीन परीक्षा घेण्यात येतात. तर शिक्षक होण्यासाठी पाच चाळणी परीक्षा लादल्याने विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. भावी गुरुजींच्या परिक्षेमध्ये उमेदवारांची होणारी अत्यल्प गर्दी दूर करण्याकरिता शासनाने सवलत दिली. तरीही उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली नाही. सवलतीमध्ये उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज स्विकृती कक्ष सुरु करण्यात आले होते. सोबतच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५० टक्के तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी ही अट शिथिल करण्यात आली, तरीही उमेदवारांचा जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारांनी पात्रता सिद्ध करावी, यासाठी शासनाकडून विविध चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र शासनाच्या या भूमीकेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. डी.एड., बी.एड., टीईटी परीक्षा न घेता शिक्षक भरतीसाठी सरळ सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी भावी गुरुजींची आहे. (वार्ताहर)