शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

गुरुजी बनण्याचा मार्ग खडतर

By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST

शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत.

खडसंगी : शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुजी बनण्याचा मार्ग आता खडतर झाला आहे.शासनाने लादलेल्या या पाच परीक्षांना सामोरे जाताना भावी गुरुजींची चांगलीच दमछाक होत असून यामध्ये वेळ व पैसाचा प्रचंड अपव्यय होत आहे. दहा वर्षापूर्वी डीएड, बीएड उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण पदावर सरळ निवड करण्यात येत होती. आता शिक्षक होण्यासाठी पाच परीक्षेच्या चाळण्यामधून उमेदवारांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागत आहे.एमपीएससी, युपीएससीमार्फत प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या प्रमुख तीन परीक्षा घेण्यात येतात. तर शिक्षक होण्यासाठी पाच चाळणी परीक्षा लादल्याने विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. भावी गुरुजींच्या परिक्षेमध्ये उमेदवारांची होणारी अत्यल्प गर्दी दूर करण्याकरिता शासनाने सवलत दिली. तरीही उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली नाही. सवलतीमध्ये उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज स्विकृती कक्ष सुरु करण्यात आले होते. सोबतच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५० टक्के तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी ही अट शिथिल करण्यात आली, तरीही उमेदवारांचा जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारांनी पात्रता सिद्ध करावी, यासाठी शासनाकडून विविध चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र शासनाच्या या भूमीकेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. डी.एड., बी.एड., टीईटी परीक्षा न घेता शिक्षक भरतीसाठी सरळ सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी भावी गुरुजींची आहे. (वार्ताहर)