शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निवाऱ्याअभावी प्रवाशांना पावसात बघावी लागते बसची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस आहे. प्रवास करताना प्रवाशी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवाऱ्याचा शोध घेतात. मात्र, गावागावांतील प्रवासी निवाऱ्याची ...

चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस आहे. प्रवास करताना प्रवाशी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवाऱ्याचा शोध घेतात. मात्र, गावागावांतील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे थांबायचे कुठे, असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ, तसेच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन दुर्लक्षित प्रवासी निवाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

कोरोना संकटानंतर आता पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना प्रवासासाठी मुख्य साधन एसटीच आहे. ग्रामीण भागातून हजारो नागरिक दररोज एसटीने प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवारे आहे. मात्र, जिल्ह्यातील अधिकाधिक प्रवासी निवारे दुर्लक्षित असून बसण्यासाठी सुविधाही नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी अनेक प्रवासी निवारे धूळ खात पडले आहेत.

प्रवासी निवाऱ्यांमुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत असताना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळते. मात्र, संबंधित विभागाने देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी सुस्थितीत प्रवासी निवारे आहे. मात्र, अस्वच्छमुळे प्रवासी तिथे न बसता, बाहेर कुठेतरी वृक्षाचा आधार घेऊन एसटीची वाट बघतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवाऱे अद्यावत करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

कोट

जिल्ह्यातील बहुतांश गावातील प्रवासी निवारे दुर्लक्षित आहे. त्यामुळे या निवाऱ्यांची दुरुस्ती करून प्रवाशांना सुविधा देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे त्यांना एसटीची वाट बघण्यासाठी प्रवासी निवाऱ्याचा सहारा घ्यावा लागतो. मात्र, काही ठिकाणी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचे हाल होते. शासनाने लक्ष देऊन गाव तिथे प्रवासी निवारा बांधावा.

- पारस पिपंळकर, संपर्क प्रमुख, अखिल भारतीय सरपंच परिषद

कोट

जिल्ह्यातील ग्रामीण, तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी एसटीचा आधार आहे. मात्र, प्रवासी निवाऱे सुस्थितीत नसल्यामुळे अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचा त्यांना आधार घ्यावा लागतो. पावसाच्या दिवसामध्ये नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रवासी निवाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

-विवेक बोरिकर, संयोजक, भूमिपत्र बिग्रेड चंद्रपूर.