शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पावसाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

By admin | Updated: August 30, 2014 23:35 IST

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या

लखमापूर : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या शेतातील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. यात अनेक कंपन्याचे महागडे बियाणे, खतांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता मोठी आर्थिक चणचण भासत आहे. याचाच परिणाम कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांसाठी अनेकदा नवीन आर्थिक धोरण आणि योजनांचा पाऊस पाडला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. शेतात उभे पीक कधी पुराने तर कधी पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात ‘जे पिकलं ते विकलं’ जात नसल्याने नेहमीच मालाच्या चढ-उतार किमतीच्या कात्रीत शेतकरी सापडत आला आहे. दोन वर्षांपासून हाताशी असलेला पैसा खर्च करून शेतकरी शेती करीत आहे. परंतु त्यांची झोळी नेहमीच रिकामी झालेली दिसत आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान यासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासाठी उत्पादन खर्चही अधिक आहे. मात्र पिकांची विक्री करताना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन माल विकावा लागतो. बाजारापेठेचा अभावही शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकताना दिसतो. यामध्ये प्रवास खर्च, मजुरी अधिक लागते. आता गावागावांत इंग्रजी शिक्षणाचे लोण पसरले आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्याकडे बघून अनेक शेतकरी पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेत दाखल केली आहे. परंतु हाताशी दमडी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे कौटुंबिक खर्च व इतर खर्च करताना त्याला अनेकदा विचार करावा लागतो. वाढत्या महागाई सोबतच मजुरी, शेती साहित्य व बियाणांचे भाव गगनाला भिडले. मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याची खंतही शेतकरी व्यक्त करतात. अनेक योजनांचा लाभ घेताना कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांचे अर्धे पैसे त्यासाठीच खर्च होतात. त्यामुळे शेतकरी योजनांपासून आजही वंचित आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजही शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास कायम आहे. नवीन तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती शेतकऱ्यांसाठी वरदान मानली जात असली तरी ‘पाणी आणि पैसा’ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे चक्र बदलत असून अधिक पाऊस आल्याने व पाऊसच न आल्याने शेतकऱ्यांना दोन्ही बाजूने अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)