शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

By admin | Updated: August 30, 2014 23:35 IST

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या

लखमापूर : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या शेतातील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. यात अनेक कंपन्याचे महागडे बियाणे, खतांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता मोठी आर्थिक चणचण भासत आहे. याचाच परिणाम कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांसाठी अनेकदा नवीन आर्थिक धोरण आणि योजनांचा पाऊस पाडला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. शेतात उभे पीक कधी पुराने तर कधी पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात ‘जे पिकलं ते विकलं’ जात नसल्याने नेहमीच मालाच्या चढ-उतार किमतीच्या कात्रीत शेतकरी सापडत आला आहे. दोन वर्षांपासून हाताशी असलेला पैसा खर्च करून शेतकरी शेती करीत आहे. परंतु त्यांची झोळी नेहमीच रिकामी झालेली दिसत आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान यासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासाठी उत्पादन खर्चही अधिक आहे. मात्र पिकांची विक्री करताना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन माल विकावा लागतो. बाजारापेठेचा अभावही शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकताना दिसतो. यामध्ये प्रवास खर्च, मजुरी अधिक लागते. आता गावागावांत इंग्रजी शिक्षणाचे लोण पसरले आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्याकडे बघून अनेक शेतकरी पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेत दाखल केली आहे. परंतु हाताशी दमडी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे कौटुंबिक खर्च व इतर खर्च करताना त्याला अनेकदा विचार करावा लागतो. वाढत्या महागाई सोबतच मजुरी, शेती साहित्य व बियाणांचे भाव गगनाला भिडले. मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याची खंतही शेतकरी व्यक्त करतात. अनेक योजनांचा लाभ घेताना कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांचे अर्धे पैसे त्यासाठीच खर्च होतात. त्यामुळे शेतकरी योजनांपासून आजही वंचित आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजही शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास कायम आहे. नवीन तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती शेतकऱ्यांसाठी वरदान मानली जात असली तरी ‘पाणी आणि पैसा’ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे चक्र बदलत असून अधिक पाऊस आल्याने व पाऊसच न आल्याने शेतकऱ्यांना दोन्ही बाजूने अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)