शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

स्वच्छता अभियानात सहकार्याच्या भावनेतून सहभागी व्हा

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

गावातील प्रत्येक रस्ता, प्रभाग व लोकवस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा आढळून आल्यास नागरिकांनी तो परिसर स्वच्छ करून सामाजिक आरोग्य जपावे, प्रत्येकांनी जर सहकार्याच्या भावनेतून

गोंडपिपरी : गावातील प्रत्येक रस्ता, प्रभाग व लोकवस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा आढळून आल्यास नागरिकांनी तो परिसर स्वच्छ करून सामाजिक आरोग्य जपावे, प्रत्येकांनी जर सहकार्याच्या भावनेतून काम केल्यास गाव स्वच्छ होईल, असे मत संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांनी व्यक्त केले. गोंडपिपरी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छता मिशन’ अभियान राबविण्याचे आवाहन केले. यात राज्य, केंद्रीयमंत्री, अभिनेते, खेळाडू, अधिकारी यांना सहभागी होण्याची विनंती केली. राज्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशन अभियानात सहभागी होऊन अधिनस्त अधिकारी व ग्राम पातळीवरील कर्मचाऱ्यांना अभियान राबविण्याच्या सुचना दिल्या. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पंचायत समितीचे उपसभापती रामचंद्र कुरवटकार, संवर्ग विकास यशवंत मोहीतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सुनील डोंगरे, उपसरपंच देवेंद्र बट्टे, तंमुस अध्यक्ष अनिल झाडे, पंचायत विस्तार अधिकारी गुंतीवार, ग्राम पंचायत सदस्य सेवानंद आत्राम, ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे व कर्मचाऱ्यांनी शहरातील जुना बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.यानंतर स्वच्छता अभियानाबाबतची जनजागृती करून प्रत्येक नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण वासलवार, माजी सरपंच दीपक फलके, शैलेशसिंह बैस, कृउबा सभापती राजीव सिंह चंदेल, असलम शेख प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)नगर परिषदेचे दुर्लक्षमूल - नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी घाण साचली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने शहरातील कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.