शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामातून शिक्षक, कर्मचाऱ्यांना अंशत: दिलासा

By admin | Updated: August 6, 2014 23:46 IST

शिक्षकांच्या मागे शासनाने विविध प्रकारची अशैक्षणिक कामे लावून ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीएलओ व निवडणुकीशी संबंधित काम होय, या कामातून मुक्त करावे,

देवाडा खुर्द : शिक्षकांच्या मागे शासनाने विविध प्रकारची अशैक्षणिक कामे लावून ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीएलओ व निवडणुकीशी संबंधित काम होय, या कामातून मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे शिक्षक व संघटनाद्वारे सातत्याने होत होती. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीनेही शिक्षणमंत्री, सहसचिव शालेय शिक्षण विभाग, मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला होता. याबाबत निवडणुकीच्या कामातून अपंग व गंभीर आजारग्रस्तांना वगळणारा व काही घटकांना सुट देणारा शासननिर्णय निघाल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शासनाचे उपसचिव व सहमुख्य निवडणुक अधिकारी निलेश गटणे यांनी कर्मचाऱ्यांना हा काही अंशी सूट देणारा आदेश १७ जुलैला नुकताच जारी केला.यामध्ये अपंग, गंभीर शारिरीक व्याधी व गंभीर आजारपण असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना या कामातून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. मात्र यासाठी सदर कर्मचारी निवडणूक कामकाज करण्यास असमर्थ असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्राची गरज असणार आहे. तसेच महिला शिक्षिका किंवा स्त्री कर्मचाऱ्यांना दूरच्या व गैरसोयीच्या मतदान केंद्रावर नियुक्ती करु नये, त्यांना मतदान केंद्रावर रात्रीच्या मुक्कामापासून सुट द्यावी, गरोदर किंवा प्रसूती रजेच्या काळात निवडणूक कामकाज देऊ नये अशाप्रकारची सूट महिलांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना मतदारविषयक कामात ३० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात नियुक्ती देऊ नये, निवडणूक जर दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत आल्यास पेपर तपासणीस व मॉडरेटर्स यांची नियुक्ती शक्यतो करु नये. मात्र याबाबत जिल्हाधिकारी वेळप्रसंगी योग्य तो निर्णय घेऊू शकतात. अशा विविध प्रकारच्या सूट देऊन शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा नक्कीच दिला आहे.यासह एखाद्या कर्मचाऱ्यांचा निवडणुक कर्तव्य बजावताना अकाली मृत्यू उद्भवल्यास अशा प्रसंगी खात्री करुन संबंधितांच्या कुटुंबियास नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. या कामापाईच लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एका शिक्षकाचा व बीएलओच्या कामामुळे भुसावळ येथील शिक्षकाचा नाहक जीव गेला होता, हे विशेष.तसेच शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार फक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाचे काम सोडता सर्व शिक्षकांना बीएलओ व निवडणुक या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. (वार्ताहर)