शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निवडणुकीच्या कामातून शिक्षक, कर्मचाऱ्यांना अंशत: दिलासा

By admin | Updated: August 6, 2014 23:46 IST

शिक्षकांच्या मागे शासनाने विविध प्रकारची अशैक्षणिक कामे लावून ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीएलओ व निवडणुकीशी संबंधित काम होय, या कामातून मुक्त करावे,

देवाडा खुर्द : शिक्षकांच्या मागे शासनाने विविध प्रकारची अशैक्षणिक कामे लावून ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीएलओ व निवडणुकीशी संबंधित काम होय, या कामातून मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे शिक्षक व संघटनाद्वारे सातत्याने होत होती. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीनेही शिक्षणमंत्री, सहसचिव शालेय शिक्षण विभाग, मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला होता. याबाबत निवडणुकीच्या कामातून अपंग व गंभीर आजारग्रस्तांना वगळणारा व काही घटकांना सुट देणारा शासननिर्णय निघाल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शासनाचे उपसचिव व सहमुख्य निवडणुक अधिकारी निलेश गटणे यांनी कर्मचाऱ्यांना हा काही अंशी सूट देणारा आदेश १७ जुलैला नुकताच जारी केला.यामध्ये अपंग, गंभीर शारिरीक व्याधी व गंभीर आजारपण असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना या कामातून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. मात्र यासाठी सदर कर्मचारी निवडणूक कामकाज करण्यास असमर्थ असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्राची गरज असणार आहे. तसेच महिला शिक्षिका किंवा स्त्री कर्मचाऱ्यांना दूरच्या व गैरसोयीच्या मतदान केंद्रावर नियुक्ती करु नये, त्यांना मतदान केंद्रावर रात्रीच्या मुक्कामापासून सुट द्यावी, गरोदर किंवा प्रसूती रजेच्या काळात निवडणूक कामकाज देऊ नये अशाप्रकारची सूट महिलांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना मतदारविषयक कामात ३० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात नियुक्ती देऊ नये, निवडणूक जर दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत आल्यास पेपर तपासणीस व मॉडरेटर्स यांची नियुक्ती शक्यतो करु नये. मात्र याबाबत जिल्हाधिकारी वेळप्रसंगी योग्य तो निर्णय घेऊू शकतात. अशा विविध प्रकारच्या सूट देऊन शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा नक्कीच दिला आहे.यासह एखाद्या कर्मचाऱ्यांचा निवडणुक कर्तव्य बजावताना अकाली मृत्यू उद्भवल्यास अशा प्रसंगी खात्री करुन संबंधितांच्या कुटुंबियास नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. या कामापाईच लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एका शिक्षकाचा व बीएलओच्या कामामुळे भुसावळ येथील शिक्षकाचा नाहक जीव गेला होता, हे विशेष.तसेच शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार फक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाचे काम सोडता सर्व शिक्षकांना बीएलओ व निवडणुक या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. (वार्ताहर)