शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले

By admin | Updated: May 1, 2017 00:36 IST

तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत.

चिमूर तालुक्यात दहा अल्पवयीन जोडप्यांचे पलायन : पालकांसह पोलीस यंत्रणाही हैराणचिमूर : तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. संबंधीतांच्या काही पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात पोलीस दप्तरी जरी दहा जणांची नोंद असली तरी ठाण्याबाहेर व तंटामुक्त समित्याद्वारे मिटविल्या जाणाऱ्या अशा प्रकरणाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे पालकासह पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी वेळीच सावधान होण्याची वेळ आली आहे.पळून जाणारे अनेकजण लग्न उरकूनच घरचा रस्ता धरत आहेत. तर अल्पवयीन असलेल्या युवक-युवतींना पालकांच्या हवाली नाही तर सुधारगृहात पाठवण्याची कसरत पोलिसांना करण्याची वेळ येत आहे. अनेक युवकांवर पास्को अंतर्गत कारवाई करावी लागत आहेत. त्यामुळे पालकांनो आता सावधान! म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. चिमूर तालुक्यातील चिमूर व भिसी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकरणाची नोंद होत आहे. या सर्व घटनामागे प्रेमप्रकरण, एकतर्फी प्रेम व घरच्यांचा लग्नास विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन विवाहिता आपल्या दोन मुलांना घरी सोडून शेजारील इसमासह बेपत्ता झाल्या आहेत. तर अलीकडेच काही महाविद्यायालयीन युवतीही आपल्या महाविद्यालयीन व शेजारी युवकांबरोबर बेपत्ता आहेत. यापैकी दोन युवतींना शोधून आणण्यास चिमूर पोलिसांना यश आले आहे.अलीकडच्या काळात मोबाईलसह अन्य साधनांमुळे जग अगदी जवळ आले आहे. काहीजण शिक्षणासाठी शहरात जात असले तरी त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष देखील त्याला कारणीभूत ठरत आहे. चित्रपटामुळेही सद्याचा युवक, युवतीच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. मुलीमध्ये तोंडाला स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले असून पालक देखील समोरून येणाऱ्या आपल्या पाल्याला ओळखेनासे झाले आहेत. (प्रतिनिधी)लग्नासाठी अपेक्षा वाढल्याआई-वडीलाना आपल्या पाल्यांना वधू-वर बघताना नाकी नऊ येत आहे. दोघांचेही शिक्षण चांगले होवूनही दोन्ही बाजूच्या वाढत्या अपेक्षा त्याला कारणीभूत ठरत आहेत. पाल्याने घरच्यांच्या विरोधात परजातीतील युवक अथवा युवतीशी लग्न केल्यास सुरुवातीला विरोध करणारे पालक शेवटच्या क्षणी मूक संमती देत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.काळानुरुप व्याख्या बदलल्याभारतीय संस्कृतीवर पाश्मिात्य संस्कृती भारी पडत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार महाविद्यालयीन युवक-युवतीमधील संबंधातील व्याख्या बदलत चालल्या आहेत. १५ वर्षाअगोदर प्रियकर व प्रेयशी असे संबोधले जात होते. मात्र आता ‘बायफ्रेंड’ व ‘गर्लफ्रेंड’ असे संबोधल्या जाते. हा प्रकार चक्क आपल्या पालकांनाही सांगितल्या जात आहे.चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका वर्षात दहा युवक-युवती पळून जाण्याच्या घटनेची नोंद असली तरी बाहेर समेट घडवल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर.