शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले

By admin | Updated: May 1, 2017 00:36 IST

तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत.

चिमूर तालुक्यात दहा अल्पवयीन जोडप्यांचे पलायन : पालकांसह पोलीस यंत्रणाही हैराणचिमूर : तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. संबंधीतांच्या काही पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात पोलीस दप्तरी जरी दहा जणांची नोंद असली तरी ठाण्याबाहेर व तंटामुक्त समित्याद्वारे मिटविल्या जाणाऱ्या अशा प्रकरणाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे पालकासह पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी वेळीच सावधान होण्याची वेळ आली आहे.पळून जाणारे अनेकजण लग्न उरकूनच घरचा रस्ता धरत आहेत. तर अल्पवयीन असलेल्या युवक-युवतींना पालकांच्या हवाली नाही तर सुधारगृहात पाठवण्याची कसरत पोलिसांना करण्याची वेळ येत आहे. अनेक युवकांवर पास्को अंतर्गत कारवाई करावी लागत आहेत. त्यामुळे पालकांनो आता सावधान! म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. चिमूर तालुक्यातील चिमूर व भिसी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकरणाची नोंद होत आहे. या सर्व घटनामागे प्रेमप्रकरण, एकतर्फी प्रेम व घरच्यांचा लग्नास विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन विवाहिता आपल्या दोन मुलांना घरी सोडून शेजारील इसमासह बेपत्ता झाल्या आहेत. तर अलीकडेच काही महाविद्यायालयीन युवतीही आपल्या महाविद्यालयीन व शेजारी युवकांबरोबर बेपत्ता आहेत. यापैकी दोन युवतींना शोधून आणण्यास चिमूर पोलिसांना यश आले आहे.अलीकडच्या काळात मोबाईलसह अन्य साधनांमुळे जग अगदी जवळ आले आहे. काहीजण शिक्षणासाठी शहरात जात असले तरी त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष देखील त्याला कारणीभूत ठरत आहे. चित्रपटामुळेही सद्याचा युवक, युवतीच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. मुलीमध्ये तोंडाला स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले असून पालक देखील समोरून येणाऱ्या आपल्या पाल्याला ओळखेनासे झाले आहेत. (प्रतिनिधी)लग्नासाठी अपेक्षा वाढल्याआई-वडीलाना आपल्या पाल्यांना वधू-वर बघताना नाकी नऊ येत आहे. दोघांचेही शिक्षण चांगले होवूनही दोन्ही बाजूच्या वाढत्या अपेक्षा त्याला कारणीभूत ठरत आहेत. पाल्याने घरच्यांच्या विरोधात परजातीतील युवक अथवा युवतीशी लग्न केल्यास सुरुवातीला विरोध करणारे पालक शेवटच्या क्षणी मूक संमती देत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.काळानुरुप व्याख्या बदलल्याभारतीय संस्कृतीवर पाश्मिात्य संस्कृती भारी पडत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार महाविद्यालयीन युवक-युवतीमधील संबंधातील व्याख्या बदलत चालल्या आहेत. १५ वर्षाअगोदर प्रियकर व प्रेयशी असे संबोधले जात होते. मात्र आता ‘बायफ्रेंड’ व ‘गर्लफ्रेंड’ असे संबोधल्या जाते. हा प्रकार चक्क आपल्या पालकांनाही सांगितल्या जात आहे.चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका वर्षात दहा युवक-युवती पळून जाण्याच्या घटनेची नोंद असली तरी बाहेर समेट घडवल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर.