शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले

By admin | Updated: May 1, 2017 00:36 IST

तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत.

चिमूर तालुक्यात दहा अल्पवयीन जोडप्यांचे पलायन : पालकांसह पोलीस यंत्रणाही हैराणचिमूर : तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. संबंधीतांच्या काही पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात पोलीस दप्तरी जरी दहा जणांची नोंद असली तरी ठाण्याबाहेर व तंटामुक्त समित्याद्वारे मिटविल्या जाणाऱ्या अशा प्रकरणाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे पालकासह पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी वेळीच सावधान होण्याची वेळ आली आहे.पळून जाणारे अनेकजण लग्न उरकूनच घरचा रस्ता धरत आहेत. तर अल्पवयीन असलेल्या युवक-युवतींना पालकांच्या हवाली नाही तर सुधारगृहात पाठवण्याची कसरत पोलिसांना करण्याची वेळ येत आहे. अनेक युवकांवर पास्को अंतर्गत कारवाई करावी लागत आहेत. त्यामुळे पालकांनो आता सावधान! म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. चिमूर तालुक्यातील चिमूर व भिसी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकरणाची नोंद होत आहे. या सर्व घटनामागे प्रेमप्रकरण, एकतर्फी प्रेम व घरच्यांचा लग्नास विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन विवाहिता आपल्या दोन मुलांना घरी सोडून शेजारील इसमासह बेपत्ता झाल्या आहेत. तर अलीकडेच काही महाविद्यायालयीन युवतीही आपल्या महाविद्यालयीन व शेजारी युवकांबरोबर बेपत्ता आहेत. यापैकी दोन युवतींना शोधून आणण्यास चिमूर पोलिसांना यश आले आहे.अलीकडच्या काळात मोबाईलसह अन्य साधनांमुळे जग अगदी जवळ आले आहे. काहीजण शिक्षणासाठी शहरात जात असले तरी त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष देखील त्याला कारणीभूत ठरत आहे. चित्रपटामुळेही सद्याचा युवक, युवतीच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. मुलीमध्ये तोंडाला स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले असून पालक देखील समोरून येणाऱ्या आपल्या पाल्याला ओळखेनासे झाले आहेत. (प्रतिनिधी)लग्नासाठी अपेक्षा वाढल्याआई-वडीलाना आपल्या पाल्यांना वधू-वर बघताना नाकी नऊ येत आहे. दोघांचेही शिक्षण चांगले होवूनही दोन्ही बाजूच्या वाढत्या अपेक्षा त्याला कारणीभूत ठरत आहेत. पाल्याने घरच्यांच्या विरोधात परजातीतील युवक अथवा युवतीशी लग्न केल्यास सुरुवातीला विरोध करणारे पालक शेवटच्या क्षणी मूक संमती देत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.काळानुरुप व्याख्या बदलल्याभारतीय संस्कृतीवर पाश्मिात्य संस्कृती भारी पडत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार महाविद्यालयीन युवक-युवतीमधील संबंधातील व्याख्या बदलत चालल्या आहेत. १५ वर्षाअगोदर प्रियकर व प्रेयशी असे संबोधले जात होते. मात्र आता ‘बायफ्रेंड’ व ‘गर्लफ्रेंड’ असे संबोधल्या जाते. हा प्रकार चक्क आपल्या पालकांनाही सांगितल्या जात आहे.चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका वर्षात दहा युवक-युवती पळून जाण्याच्या घटनेची नोंद असली तरी बाहेर समेट घडवल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर.