शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पेपर मिलचे युवा कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात

By admin | Updated: November 8, 2016 00:58 IST

येथील बल्लारपूर पेपर मिलची स्थिती कधी चालू, कधी बंद अशी बेभरोशाची होऊन बसली आहे.

बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिलची स्थिती कधी चालू, कधी बंद अशी बेभरोशाची होऊन बसली आहे. या मिलमध्ये कामगारांचे नियमित जाणे व आपली ड्युटी बजावणे सुरू आहे. मात्र, पेपर उत्पादन जवळपास बंद आहे. दिवाळीपूर्वी उत्पादन सुरू झाले होते. ते परत बंद झाले. आर्थिक अडचण आणि कच्चा माल असलेल्या बांबूचा अभाव ही कारणे सांगितली जातात. अशाप्रकारे गेल्या पाच- सहा महिन्यांपासून या मिलची वाईट स्थिती सुरू आहे. तीन महिन्यांचे पगारही अडून पडले आहेत. दिवाळीनिमित्त वार्षिक बोनसची काही रक्कम देण्यात आली, एवढेच!या सर्व कारणांपायी पेपर मिलचे भवितव्य आणि मिलमधील कर्मचाऱ्यांना आपली नोकरी राहणार की जाणार, अशा असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासले आहे. या मिलमध्ये नियमित, रोजंदारी व ठेकेदारी अशा वर्गवारीचे कर्मचारी आहेत. नियमित कामगारांना प्रतिदिन हाजरी मिळत आहे. तर ठेकेदारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड हाजरी दिली जात आहे. या कारणाने, ठेकेदारी कर्मचाऱ्यांना असुरक्षतेची भावना अधिक त्रासून सोडत आहे. त्यामुळे ठेकेदारीतील काही शिक्षित पदवीधर युवा कर्मचारी नवीन ठिकाणी नोकरीचा शोध घेत आहेत. वाढलेल्या वयामुळे ज्यांना नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नाही, त्यांना असा पर्याय नाही. परंतु २० - ३० वर्षे वय असलेले तरुण मात्र नवीन नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या पुणे, हैद्राबाद, मुंबई इत्यादी ठिकाणी फेऱ्या मारणे सुरू आहे. काहींना त्यात यशही मिळत असल्याचे सांगितल्या जाते. (तालुका प्रतिनिधी)चैतन्य हरपलेपेपर मिलच्या या अशा वाईट स्थिती पायी पेपर मिल भागातील चैतन्यच हरपले आहे. पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक टंचाईत दिवस जात आहेत. त्या परिसरातील लहान-मोठ्या विविध प्रकारच्या व्यापाराला अवकळा आली आहे. त्याची बरीचशी झळ शहरातील मुख्य बाजारपेठेलाही बसत आहे. बल्लारपूर पेपर मिल म्हणजे या शहराची वाहिनी असल्याने शहरासह तालुक्यातील बाजारपेठेचे अर्थचक्रच आता मंदावल्यासारखे दिसत आहे.