वरोरा : सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, आदी मागण्यांचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष वरोराच्या वतीने गुरुवारी तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शेतकºयांचा संप व आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्याने लाखो शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा शेतकºयांना कुठलाच फायदा झाला नाही. सरकाने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून हे सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. हा प्रकार थांबवून शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे, शेतमालाला भाव देण्यात यावा, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, शेतकºयांना ६० वर्ष वयानंतर किमान तीन हजार रुपये पेंशन देण्यात यावे, शेतकºयांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, सुकाणू समितीने केलेल्या मागणी पत्रकातील ३० मागण्या मान्य कराव्यात आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणू समितीतर्फे तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या मागण्याची दखल न घेतल्यास सुकाणू समिती व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १४ आॅगस्ट सोमवारला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा तसेच १५ आॅगस्टला पालकमंत्री व लोकप्रतिनिधींना झेंडा वंदन न करू देण्याचा इशारा निवेदनातून दिला. निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरोºयाचे तालुका अध्यक्ष अमोल डुकरे प्रहार सेवक सुरज घुमे, गणेश उराडे, नितीन नागरकर, पिंटू वासेकर, आकाश समर्थ, सुशील पिंपळकर, व आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते
कर्जमाफीविरोधात प्रहार रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:05 IST
सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, ....
कर्जमाफीविरोधात प्रहार रस्त्यावर उतरणार
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : ध्वजारोहण न करु देण्याचाही दिला इशारा