शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

By admin | Updated: August 5, 2014 23:44 IST

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार

सिंदेवाही : खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सिंदेवाही तालुक्यात धान पऱ्हे रोवणीला प्रारंभ झालेला आहे. यावर्षी खरीप हंगामाध्ये सिंदेवाही तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे, तर २२ हेक्टरवर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. आता धान पऱ्हे पेरणी योग्य झाले असून तालुक्यात आतापर्यंत २५ टक्के रोवणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची विहीर व विद्युत पंप, बोरवेलची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केलेली आहे. जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहेत, ते शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तलाव व बोड्या भरण्यासाठी साधारणत: १ हजार २०० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी आतापर्यंत ५७५ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षी भात संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद पीकेव्ही गणेश, पीकेव्ही किसान या वाणाची, कृषी सेवा केंद्रातून जय श्रीराम, सुवासिक ५५५, हिरा, सायराम नर सर्व सामान्य शेतकरी एचएमटी, श्रीराम बलवान परभणी, सोनम, क्रांती, ओमशांती या वाणाची लागवड केली आहे. सध्या महिला मजुरांची रोवण्याची मजुरी ८० ते १०० रुपयांपर्यंत गेली आहे. तालुक्यात सिंचन प्रकल्प नाहीत. भविष्यात हुमन व गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)