शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

By admin | Updated: August 5, 2014 23:44 IST

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार

सिंदेवाही : खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सिंदेवाही तालुक्यात धान पऱ्हे रोवणीला प्रारंभ झालेला आहे. यावर्षी खरीप हंगामाध्ये सिंदेवाही तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे, तर २२ हेक्टरवर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. आता धान पऱ्हे पेरणी योग्य झाले असून तालुक्यात आतापर्यंत २५ टक्के रोवणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची विहीर व विद्युत पंप, बोरवेलची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केलेली आहे. जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहेत, ते शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तलाव व बोड्या भरण्यासाठी साधारणत: १ हजार २०० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी आतापर्यंत ५७५ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षी भात संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद पीकेव्ही गणेश, पीकेव्ही किसान या वाणाची, कृषी सेवा केंद्रातून जय श्रीराम, सुवासिक ५५५, हिरा, सायराम नर सर्व सामान्य शेतकरी एचएमटी, श्रीराम बलवान परभणी, सोनम, क्रांती, ओमशांती या वाणाची लागवड केली आहे. सध्या महिला मजुरांची रोवण्याची मजुरी ८० ते १०० रुपयांपर्यंत गेली आहे. तालुक्यात सिंचन प्रकल्प नाहीत. भविष्यात हुमन व गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)