शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांचे कंबरडे मोडणार

By admin | Updated: November 27, 2014 23:32 IST

देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही

मारोडा : देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही बाजूने कशी कोंडी होते, याचे सध्या ज्वलंत चित्र बघावयाला मिळते. याच परिस्थितीचा सामना सध्या लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करणारे मतदार शेतकरी करीत आहेत.आगीत घर जळून खाक व्हावे व राख धुमसत राहावी, अशी अनेक शेतकऱ्यांची आज स्थिती झालेली आहे. यावर्षी आवश्यक तेवढा पाऊसच पडला नाही. पऱ्हे भरले ते जाग्यावरच सुकले. अनेक शेतकऱ्यांनी रोवणे केले. त्यांना पाणी मिळाले नाही रोवणे रोवलेलीच स्थिती राहिली. उभी रोपे सुकून गेली. वारंवार खंडीत वीज पुररवठा व अत्यंत संघर्ष करुन मिळविलेले पाणी शेताला मिळावे म्हणून आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या हाल अपेष्टा भोगल्या. रात्र-रात्रं जागून काढली. ज्यांना पाणी मिळाले, त्यांच्या पिकांना धार आली. परंतु जंगली प्राणी, रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या क्षेत्राला लागूनच जंगल आहे. बफर झोनची सीमा आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जंगली श्वापदांचा नेहमीच सामना करावा लागतो. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या धान कापणीसाठी मजुरही मिळत नसल्याने धान उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. महिलांना वारेमाप रोजी द्यावी लागते. पुरुष मजूर किमान २०० रुपये रोजी घेतात. एवढे पैसे देऊनही मजूर हाती लागत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. शिकलेल्या माणूस धानाचे भारे खांद्यावर वाहायला डगमगत आहे.मारोडा, भादुर्णी, उश्राळा येथून सुमारे ४०० मजूर रोज मूल येथे कामाला येतात. त्यामुळे स्थानिक स्थितीवर शेतकरी नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. काहींनी धान बांधणी करुन मळणीला प्रारंभ केला. याच काळात मागील वर्षी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० प्रति क्विंटल भाव होता. यावर्षी ४०० ते ५०० रुपयांनी भाव घसरला आहे. तरी खासगी सावकार व बँकांचे कर्ज देण्यासाठी व धान साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी धान विकत आहेत. चारही बाजुंनी शेतकरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेकांनी शेती सोडली. येणाऱ्या पाच वर्षात हिच स्थिती कायम राहिली तर धान्य उत्पादनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. किमान तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)