शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

धान उत्पादकांचे कंबरडे मोडणार

By admin | Updated: November 27, 2014 23:32 IST

देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही

मारोडा : देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही बाजूने कशी कोंडी होते, याचे सध्या ज्वलंत चित्र बघावयाला मिळते. याच परिस्थितीचा सामना सध्या लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करणारे मतदार शेतकरी करीत आहेत.आगीत घर जळून खाक व्हावे व राख धुमसत राहावी, अशी अनेक शेतकऱ्यांची आज स्थिती झालेली आहे. यावर्षी आवश्यक तेवढा पाऊसच पडला नाही. पऱ्हे भरले ते जाग्यावरच सुकले. अनेक शेतकऱ्यांनी रोवणे केले. त्यांना पाणी मिळाले नाही रोवणे रोवलेलीच स्थिती राहिली. उभी रोपे सुकून गेली. वारंवार खंडीत वीज पुररवठा व अत्यंत संघर्ष करुन मिळविलेले पाणी शेताला मिळावे म्हणून आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या हाल अपेष्टा भोगल्या. रात्र-रात्रं जागून काढली. ज्यांना पाणी मिळाले, त्यांच्या पिकांना धार आली. परंतु जंगली प्राणी, रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या क्षेत्राला लागूनच जंगल आहे. बफर झोनची सीमा आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जंगली श्वापदांचा नेहमीच सामना करावा लागतो. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या धान कापणीसाठी मजुरही मिळत नसल्याने धान उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. महिलांना वारेमाप रोजी द्यावी लागते. पुरुष मजूर किमान २०० रुपये रोजी घेतात. एवढे पैसे देऊनही मजूर हाती लागत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. शिकलेल्या माणूस धानाचे भारे खांद्यावर वाहायला डगमगत आहे.मारोडा, भादुर्णी, उश्राळा येथून सुमारे ४०० मजूर रोज मूल येथे कामाला येतात. त्यामुळे स्थानिक स्थितीवर शेतकरी नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. काहींनी धान बांधणी करुन मळणीला प्रारंभ केला. याच काळात मागील वर्षी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० प्रति क्विंटल भाव होता. यावर्षी ४०० ते ५०० रुपयांनी भाव घसरला आहे. तरी खासगी सावकार व बँकांचे कर्ज देण्यासाठी व धान साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी धान विकत आहेत. चारही बाजुंनी शेतकरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेकांनी शेती सोडली. येणाऱ्या पाच वर्षात हिच स्थिती कायम राहिली तर धान्य उत्पादनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. किमान तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)