शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांचे कंबरडे मोडणार

By admin | Updated: November 27, 2014 23:32 IST

देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही

मारोडा : देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही बाजूने कशी कोंडी होते, याचे सध्या ज्वलंत चित्र बघावयाला मिळते. याच परिस्थितीचा सामना सध्या लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करणारे मतदार शेतकरी करीत आहेत.आगीत घर जळून खाक व्हावे व राख धुमसत राहावी, अशी अनेक शेतकऱ्यांची आज स्थिती झालेली आहे. यावर्षी आवश्यक तेवढा पाऊसच पडला नाही. पऱ्हे भरले ते जाग्यावरच सुकले. अनेक शेतकऱ्यांनी रोवणे केले. त्यांना पाणी मिळाले नाही रोवणे रोवलेलीच स्थिती राहिली. उभी रोपे सुकून गेली. वारंवार खंडीत वीज पुररवठा व अत्यंत संघर्ष करुन मिळविलेले पाणी शेताला मिळावे म्हणून आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या हाल अपेष्टा भोगल्या. रात्र-रात्रं जागून काढली. ज्यांना पाणी मिळाले, त्यांच्या पिकांना धार आली. परंतु जंगली प्राणी, रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या क्षेत्राला लागूनच जंगल आहे. बफर झोनची सीमा आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जंगली श्वापदांचा नेहमीच सामना करावा लागतो. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या धान कापणीसाठी मजुरही मिळत नसल्याने धान उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. महिलांना वारेमाप रोजी द्यावी लागते. पुरुष मजूर किमान २०० रुपये रोजी घेतात. एवढे पैसे देऊनही मजूर हाती लागत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. शिकलेल्या माणूस धानाचे भारे खांद्यावर वाहायला डगमगत आहे.मारोडा, भादुर्णी, उश्राळा येथून सुमारे ४०० मजूर रोज मूल येथे कामाला येतात. त्यामुळे स्थानिक स्थितीवर शेतकरी नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. काहींनी धान बांधणी करुन मळणीला प्रारंभ केला. याच काळात मागील वर्षी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० प्रति क्विंटल भाव होता. यावर्षी ४०० ते ५०० रुपयांनी भाव घसरला आहे. तरी खासगी सावकार व बँकांचे कर्ज देण्यासाठी व धान साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी धान विकत आहेत. चारही बाजुंनी शेतकरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेकांनी शेती सोडली. येणाऱ्या पाच वर्षात हिच स्थिती कायम राहिली तर धान्य उत्पादनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. किमान तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)