शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

भात उत्पादक शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 4, 2016 00:50 IST

जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे.

बल्लारपूर तालुका : आतापर्यंत १०८० मिली पावसाची नोंदबल्लारपूर : जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे. गतवर्षी याच महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ९७९ मिलीमिटर पर्जन्यमानाची नोंद झाली आणि शेतकरी वर्गाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र बल्लारपूर तालुक्यात जून व जुलै या दोन महिन्यातच १०८० मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्याच महिन्यात पर्जन्यमानाने सरासरी गाठल्याने यावर्षी शेतकरी वर्गाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आतापासून निर्माण झाली आहे.बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिली पावसाचे आहे. या तुलनेत यावर्षी तालुक्यात १०८० मिली पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. दोन महिन्यात पावसाने सरासरी पूर्ण केल्याचे दिसून येते. या पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा आहे. परंतु कापूस, सोयाबीन, तूर व अन्य कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान करणारा पाऊस ठरला आहे. बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पिकांसाठी निर्धारीत आहे. यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर भात पऱ्हे टाकले असून २ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रात रोवणी केली जात आहे. यावर्षीचा पाऊस भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा आहे.बल्लारपूर तालुक्यातील वर्धा, इरई नदीला लागून व अन्य वाहणाऱ्या नाल्याला लागून असल्याने नदी व नाल्याच्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मध्यंतरी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोर जावे लागले. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावून अवघ्या दोन महिन्यात सरासरी ओलांडली आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचा पाऊस शिल्लक आहे. परिणामी बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करावे लागण्याची भिती सतावत आहे.तालुक्यातील कृषी उत्पादन कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. यंदाचा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना तारक तर सोयाबिन, कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)