शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भात उत्पादक शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 4, 2016 00:50 IST

जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे.

बल्लारपूर तालुका : आतापर्यंत १०८० मिली पावसाची नोंदबल्लारपूर : जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे. गतवर्षी याच महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ९७९ मिलीमिटर पर्जन्यमानाची नोंद झाली आणि शेतकरी वर्गाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र बल्लारपूर तालुक्यात जून व जुलै या दोन महिन्यातच १०८० मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्याच महिन्यात पर्जन्यमानाने सरासरी गाठल्याने यावर्षी शेतकरी वर्गाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आतापासून निर्माण झाली आहे.बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिली पावसाचे आहे. या तुलनेत यावर्षी तालुक्यात १०८० मिली पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. दोन महिन्यात पावसाने सरासरी पूर्ण केल्याचे दिसून येते. या पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा आहे. परंतु कापूस, सोयाबीन, तूर व अन्य कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान करणारा पाऊस ठरला आहे. बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पिकांसाठी निर्धारीत आहे. यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर भात पऱ्हे टाकले असून २ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रात रोवणी केली जात आहे. यावर्षीचा पाऊस भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा आहे.बल्लारपूर तालुक्यातील वर्धा, इरई नदीला लागून व अन्य वाहणाऱ्या नाल्याला लागून असल्याने नदी व नाल्याच्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मध्यंतरी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोर जावे लागले. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावून अवघ्या दोन महिन्यात सरासरी ओलांडली आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचा पाऊस शिल्लक आहे. परिणामी बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करावे लागण्याची भिती सतावत आहे.तालुक्यातील कृषी उत्पादन कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. यंदाचा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना तारक तर सोयाबिन, कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)