शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाण्याअभावी धान पिकांना जबर फटका

By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST

आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन

घोसरी : आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन गर्भातच पिकांना फूटवे निघाले. संपूर्ण पिके नष्ट होत आहेत. आधिच कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.मूल-पोंभुर्णा तालुक्याच्या टोकावरील बेंबाळ-नांदगाव- घोसरी परिसरात मुख्यत्वे धान्याचे पीक घेतले जाते. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी नेहमीच पिचला जात आहे. परिसरातील बेंबाळ नांदगाव, घोसरी, फुटाणा, गोवर्धन, बोंडाळा, दिघोरी येथील पिकेच्या नियोजनशुन्यतेमुळे शेवटच्या क्षणी पिकांना पाणी मिळत नसल्याने दरवर्षी पिकांना जबर फटका बसत असते. आसोला तलावात पाणी साठा अपुरा असताना नियोजनबद्धरित्या पाणी पुरवठा करणे गरजेचे होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीने आवश्यकता नसताना रोवणीकरिता कालव्याद्वारे मुबलक पाणी सोडण्यात आले. विशेषत: त्यावेळी पावसाने हजेरी लावलेली होती. वेळीच पाण्याचा काटकसरीने पुरवठा केला असता तर आजघडीला १०-१५ तारखेपर्यंत टेलवरील पिकांना पाणी पुरवठा होवून धानपिकांना संजीवनी मिळाली असती. परंतु अधिकारी सद्य:स्थितीत तलावात पाणी नसल्याचे हेरुन हतबलता दर्शविली आहे. परिणामी पाण्याअभावी टेलवरील धानपिके नष्ट होत असल्याने शेतकरी पुरता हतबल ठरलेला असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागणारआहे. (वार्ताहर)