शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:03 IST

कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीचे नियम धाब्यावर: जडवाहतुकीमुळे अल्पावधितच रस्त्याचे तीनतेरा

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीने अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आले. त्यामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालणार कोण, हा नागरिकांचा प्रश्न आहे.राजुरा तालुका काळ्या सोन्याचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाची वाहतूक सुरु आहे. रस्त्याची क्षमता नसतानाही कोळशाची जड वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीदरम्यान कोळसा अंगावर पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र अशी कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरु राहिल्यास या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, अशी एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, हा प्रश्न खरेतर संबधित अधिकाºयांची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.राजुरा तालुक्यात गोवरी, पोवनी, सास्ती, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. ही गावे वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात येतात. प्रदूषणाच्या सर्वाधिक झळा या गावातील नागरिकांना सहन कराव्या लागतात. वेकोलित मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण आहे. त्यामुळे वेकोलित काम करणाºया कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोवरी डीप कोळसा खाणीतून होेणारी ओव्हरलोड वाहतूक गोवरी- पोवनी- कवठाळा या मार्गाने होते. दिवसरात्र या मार्गावर ट्रकांचे आवागमन होते. त्यामुळे गोवरी- पोवनी या मुख्य रस्त्याचे अल्पावधीतच बारा वाजले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. वेकोलितून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक थांबावी, यासाठी गोवरी, पोवनीवासीयांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलिच्या मुजोर अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. परंतु हीच वाहतूक आज नागरिकांच्या जिवावर उठली आहे.ताडपत्रीचा वापरच नाहीकोळसा वाहतूक करताना वाहनचालकांना काही नियम आखून दिले आहे. वाहतूक करताना त्यावर ताडपत्री झाकणे बंधनकारक आहे. ओव्हरलोड वाहतूक करु नये, यासाठी नियम घालून दिले असताना या नियामांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.कोळसा खाणीतून होणारी वाहतूक नियमबाह्य आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दैनावस्था झाली असून कोळशाची ओव्हरलोड वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरेल.- भास्कर जुनघरी, नागरिक गोवरी