शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:03 IST

कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीचे नियम धाब्यावर: जडवाहतुकीमुळे अल्पावधितच रस्त्याचे तीनतेरा

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीने अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आले. त्यामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालणार कोण, हा नागरिकांचा प्रश्न आहे.राजुरा तालुका काळ्या सोन्याचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाची वाहतूक सुरु आहे. रस्त्याची क्षमता नसतानाही कोळशाची जड वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीदरम्यान कोळसा अंगावर पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र अशी कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरु राहिल्यास या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, अशी एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, हा प्रश्न खरेतर संबधित अधिकाºयांची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.राजुरा तालुक्यात गोवरी, पोवनी, सास्ती, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. ही गावे वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात येतात. प्रदूषणाच्या सर्वाधिक झळा या गावातील नागरिकांना सहन कराव्या लागतात. वेकोलित मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण आहे. त्यामुळे वेकोलित काम करणाºया कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोवरी डीप कोळसा खाणीतून होेणारी ओव्हरलोड वाहतूक गोवरी- पोवनी- कवठाळा या मार्गाने होते. दिवसरात्र या मार्गावर ट्रकांचे आवागमन होते. त्यामुळे गोवरी- पोवनी या मुख्य रस्त्याचे अल्पावधीतच बारा वाजले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. वेकोलितून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक थांबावी, यासाठी गोवरी, पोवनीवासीयांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलिच्या मुजोर अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. परंतु हीच वाहतूक आज नागरिकांच्या जिवावर उठली आहे.ताडपत्रीचा वापरच नाहीकोळसा वाहतूक करताना वाहनचालकांना काही नियम आखून दिले आहे. वाहतूक करताना त्यावर ताडपत्री झाकणे बंधनकारक आहे. ओव्हरलोड वाहतूक करु नये, यासाठी नियम घालून दिले असताना या नियामांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.कोळसा खाणीतून होणारी वाहतूक नियमबाह्य आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दैनावस्था झाली असून कोळशाची ओव्हरलोड वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरेल.- भास्कर जुनघरी, नागरिक गोवरी