शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कृषी पंपांची थकबाकी ६१ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:59 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर परिमंडळ : थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडीत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे. थकबाकीदार कृषी पंपधारकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम वीज कंपनीकडून हाती घेण्यात आली असून चालू एक वर्षाच्या बिलाची थकबाकी न भरल्यास कृषी पंधारकाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.महावितरणद्वारे चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकोपयोगी योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून थकबाकीदारांना दिलासा मिळत आहे. मात्र अशा योजनानंतरही अनेक ग्राहक थकीत बिलाचा भरणा करण्यास दिरंगाई करीत आहेत. एकीकडे महावितरणकडून अनेक कामे सुरू असताना कृषी पंपधारकांकडून वीज बिलाची वसुली मात्र अत्यल्प आहे. याचा फटका बसून महावितरणला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने पाऊल उचलत चालू एक वर्षाचे देयक व थकबाकीची रक्कम कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.चालू वर्षाच्या देयकाव्यतिरिक्त उर्वरीत थकबाकीही टप्प्याटप्प्याने कृषी पंधारकांनी भरण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. तसेच कृषी पंपधारक वीज ग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरूस्त करण्यापूर्वी कृषी पंपधारकांनी कृषी पंपावर योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविणे अत्यावश्यक आहे. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्याची खातरजमा केल्यावरच नवीन रोहित्र देण्याचे निर्देश आहेत. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्यास महावितरणच्या वीजवहन यंत्रणेवर ताण येत नसतो तसेच कृषी पंपधारकांच्या पंपास योग्य वीजपुरवठा मिळूण ते जळण्याची शक्यता नसते, असे त्यांनी म्हटले आहे.विभागनिहाय थकबाकीचंद्रपूर परिमंडळांतर्गत असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली मंडळातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपूरी अशा सहाही विभागातील कृषी पंपधारकांकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागातील कृषी पंपधारकांकडे २ कोटी १३ लाख २१ हजार, वरोरा विभागात १६ कोटी ८० लाख ७१ हजार, बल्लारपूर विभागात १७ कोटी ७८ लाख ४ हजार, गडचिरोली विभागात ७ कोटी ४२ लाख ८३ हजार, आलापल्ली विभागात ६ कोटी ६८ लाख ५७ हजार व ब्रम्हपूरी विभागात ११ कोटी १४ लाख १३ हजार रूपये थकबाकी आहे.