शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले.

ठळक मुद्देइच्छाशक्ती वाढवा : १०६९ चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुपटीने चाचण्या करण्यात येत आहेत. आता थोडेफार लक्षणे दिसत असतील तर नागरिकही स्वयंस्फूर्तीने चाचण्या करू लागले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ८५ हजार ४८४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. यातील लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्वांच्याच चाचण्या केल्या जात आहे.कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९६ हजार ५३७ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९६ हजार ४२ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या केवळ ४९५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार ४८४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ४१ हजार ८६० चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर ४३ हजार ६२४ चाचण्या अ‍ॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर आठ हजार ४९९ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल यायचा असून ४०७ चाचण्यांबाबत संभ्रम आहे.संपर्कातून होत आहे संसर्गचंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या