शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सिंचनाचा बॅकलॉग आमच्याच काळात घटला - मुख्यमंत्र्यांचा दावा

By admin | Updated: February 14, 2017 00:34 IST

राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे कॉग्रेसचे सरकार होते. तरीही शिक्षण आणि सिंचनासारख्या क्षेत्रात बॅकलॉग सतत वाढत गेला.

सिंदेवाही : राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे कॉग्रेसचे सरकार होते. तरीही शिक्षण आणि सिंचनासारख्या क्षेत्रात बॅकलॉग सतत वाढत गेला. मात्र आमचे सरकार सत्तेत आल्यावर केवळ दोन वर्षातच काही प्रमाणत बॅकलॉग घटला. येत्या काही वर्षांतच तो पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सिंदेवाही येथे मुख्यमंत्र्यांची सभा सोमवारी पार पडली. त्यावेळी आपल्या २० मिनिटांच्या भाषणातून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी मागील १५ वर्षात महाराष्ट्र कर्जात टाकला. सिंचन विद्युत, शिक्षणाची वाट लावली. केंद्रात व राज्यात ते सत्तेत असूनही गोसेखुर्द प्रकल्प १५ वर्षांपासून रखडत राहिला. मागील दोन वर्षांत या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कोटी रुपये दिले आहे. येणाऱ्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगून राज्यातील सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा पीकविमा, धानाला योग्य भाव, सिंचन व्यवस्था याला प्राधान्य देवून काम करणारे आहे. सामान्यांना हक्काचे घर, मूलभूत सुविधा देण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)‘ते’ शाई फेकणारे काँग्रेसचेच- मुनगंटीवारकाँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेत मंचावर चढून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नागपुरात रविवारी घडला होता. यावर बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शाई फेकणारे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मागील १५ वर्षात काँग्रेसने घोटाळे करून ठेवले. ही बाब जनतेच्या मनात खटकत आहे. त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हा राग असा व्यक्त केला. सिंदेवाहीला नगर पंचायतीमध्ये सत्ता दिली. आता आपण या शहरासाठी तीन कोटी रुपये देण्याचा शब्द लवकरच पूर्ण करू.