शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मूलमध्ये रेल्वेतून होतेयं दारूची तस्करी

By admin | Updated: May 10, 2015 01:08 IST

जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर वचक बसलेला नाही.

मूल : जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर वचक बसलेला नाही. अवैध मार्गाने रेल्वेने दारू आणण्याची नवीन शक्कल लढविली जात असल्याने मूल शहरात दारूचा पुरवठा होऊ लागला आहे. रेल्वेची तिकीट कमी असल्याने दारूची तस्करी केल्यानंतरही फायदा मिळत असल्याने अवैध विक्री करणाऱ्यांनी बल्लारपूर-गोंदिया रेल्वेनी दारू आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दारूबंदी झाल्याने मूल शहराबरोबरच तालुक्यातील गावा-गावात होणारे तंटे, उद्भवणारे वाद संपुष्टात येऊ लागले आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी नेहमी होणाऱ्या भांडणावर पायबंध घातला गेला आहे. दारूबंदीमुळे उध्दवस्त होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न असताना मात्र अवैध मार्गाने पैसे कमाविण्याची सवय जडलेल्या लोकांना चैन पडत नसल्याचे दिसते. अवैध मार्गाने दारू आणून दारुड्यांची गरज भागविली जात आहे. मूळ किमतीपेक्षा तिप्पट किमतीने दारूची विक्री होत असल्याने उर्वरित खर्च वजा जाता अशा दारू विक्रेत्याला अधिक फायदा मिळत असल्याने अवैध विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. मूल शहरातील कुठल्याही ठिकाणी दारू मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र जास्त किंमत मोजावी लागत असल्याचे शौकीन सांगतात. यावरुन दारूबंदीमुळे उद्धवस्त होणारे संसार सावरण्याऐवजी मोडकळीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मूल पोलिसांनी ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेचा आधार घेऊन अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर पायबंद घालावा. तसेच मूल शहरात आपली यंत्रणा सज्ज करून अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मूलला गोंदियावरुन येणाऱ्या सर्व रेल्वेची चौकशी करावी. (तालुका प्रतिनिधी)