शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

‘ढैंचा’ बियाणे फुलविणार सेंद्रिय शेती

By admin | Updated: June 9, 2014 23:33 IST

शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात आहे.

चंद्रपूर : शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात  आहे.  चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेत यंदाच्या खरीप हंगामासाठी ‘ढैंचा’ बियाणे उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाभरात तब्बल २२८.२0 क्विंटल ढैंचा बियाणे पंचायत समिती स्तरावर उपलब्ध  करून देण्यात आले आहे. या माध्यमातून शेकडो एकर सेंद्रिय शेती फुलणार आहे.धान उत्पादक पट्टय़ातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणारे ढैंचा बियाणे सोयाबीन व कापूस पिकविणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. दिवसागणिक वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. मात्र अजूनही शेतकरी रासायनिक खताची मागणी करीत आहे. पिकांसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला असून सेस फंडातून ८ लाखाची तरतूद ढैंचा बियाण्यांसाठी केली आहे. ७५ टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना बियाणे पुरवठा करण्याचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून खरीप हंगाम २0१४ करिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना २८८.२0 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे.  शेतकर्‍यांना  सदर  बियाणे अनुदानावर ९२५ रुपयात मिळणार असल्याची माहिती   कृषी सभापती अरुण निमजे व कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)