शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नरेगाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश

By admin | Updated: August 20, 2016 00:41 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यातील गरीब, ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात.

हंसराज अहीर : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभाचंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यातील गरीब, ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. अनेक ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोबदला वेळेवर दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मजुरांना नरेगाची रक्कम वेळेवर देण्याचे आदेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या मा.सां. कन्नमवार सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा ना. अहीर यांनी घेतला. यावेळी ना. अहीर म्हणाले की, काही ठिकाणी नरेगा मजूर तसेच शेततळ्यांची रक्कम वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. सदर देयके तत्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देताना सिकलसेलग्रस्त रूग्णांना प्राधान्याने दिला जावा, असेही निर्देश त्यांनी दिले.कृषि क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सिंचन, वीज फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासोबतच जास्तीत जास्त शेतक?्यांनी वेळेत वीज कनेक्शन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी ना.अहीर यांनी नरेगा, शेततळे, वैयक्तिक शौचालय, आधार लिंकेज, दिनदयाल अंत्योदन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, ई-मोजणी, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, नॅशनल अर्बन मिशन, अमृत व उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पिककर्ज व पुनर्गठन आदींचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर माहिती दिली. या बैठकीला आ.नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रोहयोच्या विहिरी दुहेरी लाभाच्याराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागरिकांच्या हाताला काम देणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे. ही योजना ग्रामीण पातळीवर प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योनजेंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरी दुहेरी फायद्याच्या आहे. यातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासोबतच विहिरीच्या माध्यमातून सिंचनासारखी सुविधा निर्माण होत असल्याने प्रत्येक तालुक्यात या योजनेंतर्गत विहिरींची कामे मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शेततळ्यांची संख्या वाढविण्यासाठी शेतकरी, कंत्राटदार यांची सांगड घालण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.