शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

शेतकऱ्यांची जमीन सरकार जमा करण्याचे आदेश

By admin | Updated: June 29, 2015 01:35 IST

तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना ...

तळोधी परिसरात खळबळ : महसूल विभागाकडून मनस्तापतळोधी : तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना महसूल विभागाने शेकडो शेतकऱ्यांच्या वहीवाटीतील हजारो एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश काढल्याने एक खळबळ उडाली आहे. अशा आदेशामुळे त्यांना यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नसल्याचे शेकडो शेतकऱ्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या वाडवडीलांनी २० ते ४० वर्षापूर्वी काही जमिनी खरेदी केली असून त्यांच्या वारसदाराकडे सदर जमिनीचा दस्तावेज उपलब्ध आहे. सदर शेतीच्या उत्पन्नावरच अनेक शेतकरी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. सदर शेतीच्या वहीवाटीचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे २०-४५ वर्षापर्यंतचा आहे. सदर जमीन शासकीय रेकार्डनुसार शेतकऱ्यांच्याच मालकीची असून त्यांनी या शेतीवरच शासनाच्या अनेक योजनेचा लाभही घेतला आहे. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक महसूल विभागाकडून जमिनी सरकार जमा करण्याचे आदेश आले. संबंधित जमिनी भूमीधारी हक्कावर वाटप करण्यात आल्या असून याच्या खरेदी-विक्री व्यवहारात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे नियम पुस्तिका खंड दोनचे नियम ८० अन्वये शर्तभंग झालेला आहे. करिता सदर जमीन सरकार जमा करण्यात येत असल्याची माहिती देऊन तहसील कार्यालयात आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकऱ्यांची सुनावणीही घेण्यात आली होती.तद्नंतर तहसीलदार नागभीड व उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे अ‍ॅड. विजय सहारे यांनी शेतकऱ्यांची बाजू लेखी उत्तरासह स्पष्ट केली. परंतु सदर जमीन खरेदी-विक्री सक्षम महसूल अधिकाऱ्यांची रितसर परवानगी न घेतल्याने सदर जमीन सरकार जमा करण्यात हरकत नाही, असे सांगून शेतजमीन सरकार जमा करण्यात येते. अशा प्रकारचा आदेश संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांची प्रकरणे सुनावणीकरिता तहसीलदार नागभीड, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे तळोधी(बा) परिसरातील लखमापूर सांझ्यातील भूमीधारी हवकाची जमीन खरेदी करून वहीवाट करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, अशी माहिती निलेश पोशट्टीवार, श्रीराम बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)या जमीन प्रकरणात झालेला खरेदी विक्रीचा व्यवहार हा अवैध असल्यामुळे महसुल विभागाने केलेली कारवाई योग्य आहे. परंतु सदर व्यवहार नियमित करण्याकरिता भरावी लागणारी रक्कम सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारी असल्याने संबंधित शेतकऱ्यांचा मालकी हक्क कायम ठेवण्याकरिता शासनाने नवीन अध्यादेश काढणे गरजेचे आहे.-डॉ. सतीश वारजूकरमाजी जि.प. अध्यक्ष तथाविद्यमान जि.प. सदस्य,जि.प. चंद्रपूर