शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची जमीन सरकार जमा करण्याचे आदेश

By admin | Updated: June 29, 2015 01:35 IST

तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना ...

तळोधी परिसरात खळबळ : महसूल विभागाकडून मनस्तापतळोधी : तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना महसूल विभागाने शेकडो शेतकऱ्यांच्या वहीवाटीतील हजारो एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश काढल्याने एक खळबळ उडाली आहे. अशा आदेशामुळे त्यांना यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नसल्याचे शेकडो शेतकऱ्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या वाडवडीलांनी २० ते ४० वर्षापूर्वी काही जमिनी खरेदी केली असून त्यांच्या वारसदाराकडे सदर जमिनीचा दस्तावेज उपलब्ध आहे. सदर शेतीच्या उत्पन्नावरच अनेक शेतकरी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. सदर शेतीच्या वहीवाटीचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे २०-४५ वर्षापर्यंतचा आहे. सदर जमीन शासकीय रेकार्डनुसार शेतकऱ्यांच्याच मालकीची असून त्यांनी या शेतीवरच शासनाच्या अनेक योजनेचा लाभही घेतला आहे. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक महसूल विभागाकडून जमिनी सरकार जमा करण्याचे आदेश आले. संबंधित जमिनी भूमीधारी हक्कावर वाटप करण्यात आल्या असून याच्या खरेदी-विक्री व्यवहारात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे नियम पुस्तिका खंड दोनचे नियम ८० अन्वये शर्तभंग झालेला आहे. करिता सदर जमीन सरकार जमा करण्यात येत असल्याची माहिती देऊन तहसील कार्यालयात आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकऱ्यांची सुनावणीही घेण्यात आली होती.तद्नंतर तहसीलदार नागभीड व उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे अ‍ॅड. विजय सहारे यांनी शेतकऱ्यांची बाजू लेखी उत्तरासह स्पष्ट केली. परंतु सदर जमीन खरेदी-विक्री सक्षम महसूल अधिकाऱ्यांची रितसर परवानगी न घेतल्याने सदर जमीन सरकार जमा करण्यात हरकत नाही, असे सांगून शेतजमीन सरकार जमा करण्यात येते. अशा प्रकारचा आदेश संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांची प्रकरणे सुनावणीकरिता तहसीलदार नागभीड, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे तळोधी(बा) परिसरातील लखमापूर सांझ्यातील भूमीधारी हवकाची जमीन खरेदी करून वहीवाट करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, अशी माहिती निलेश पोशट्टीवार, श्रीराम बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)या जमीन प्रकरणात झालेला खरेदी विक्रीचा व्यवहार हा अवैध असल्यामुळे महसुल विभागाने केलेली कारवाई योग्य आहे. परंतु सदर व्यवहार नियमित करण्याकरिता भरावी लागणारी रक्कम सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारी असल्याने संबंधित शेतकऱ्यांचा मालकी हक्क कायम ठेवण्याकरिता शासनाने नवीन अध्यादेश काढणे गरजेचे आहे.-डॉ. सतीश वारजूकरमाजी जि.प. अध्यक्ष तथाविद्यमान जि.प. सदस्य,जि.प. चंद्रपूर