शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे आदेश कागदावरच

By admin | Updated: March 30, 2015 00:48 IST

पर्यावरणाबरोबरच वसुंधरेचे रक्षण काळाची गरज बनली असताना प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याऐवजी भर घालणाऱ्या घटकामध्ये प्लास्टिक पिशव्याच मोलाची भूमिका आहे.

चंद्रपूर : पर्यावरणाबरोबरच वसुंधरेचे रक्षण काळाची गरज बनली असताना प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याऐवजी भर घालणाऱ्या घटकामध्ये प्लास्टिक पिशव्याच मोलाची भूमिका आहे. पर्यावरणाचा समतोल तर, बिघडत आहेत सोबत मुक्या जनावरांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ धजावत नाही. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक पथक स्थापन करून मोहीम आरंभली होती. मात्र आता ते पथकही बेपत्ता झाले आहे.शासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे आदेश निर्गमित केले. परंतु अधिनियम २00६ अन्वये ३ मार्च २00६पासून महाराष्ट्र प्लास्टिक पिशवी बंदीसाठी नियम व अटी बनविण्यात आल्या. त्यानुसार ५0 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८-१२ लांबीपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक थैली वापर व उत्पादनावर बंदी घालण्यात आली. पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्वाकांक्षी कायदा पारित केला परंतु या आदेशाची अंमलबजावणी करणारेच उदासिन असल्याने या कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात या कायद्याची खिल्ली उडविली जात आहे. सर्व नियमांना धाब्यावर बसवून लहानमोठे दुकानदार फळभाज्या विक्रेते, हॉटेल्स व इतर दुकानांमध्ये सर्रास या पिशव्यांचा वापर करीत आहेत. पातळ प्लास्टिक थैली ही अविघटनशील, कुजत नसल्याने स्पष्ट होत नाही व या पिशव्यांवर पुन्हा प्रक्रिया करून पुनर्निर्मिती करता येत नाही. गुरांनाही यामुळे त्रास होतो. (नगर प्रतिनिधी)महानगरपालिकेने प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी काही दिवसापूर्वी पथकाचे गठन केले होते. या पथकाने काही दिवस मोहीम सुरु ठेवली. आता मात्र पथकच बेपत्ता झाले आहे. शहरातील व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पथकाने शहरात पुन्हा मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.