शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे आदेश कागदावरच

By admin | Updated: March 30, 2015 00:48 IST

पर्यावरणाबरोबरच वसुंधरेचे रक्षण काळाची गरज बनली असताना प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याऐवजी भर घालणाऱ्या घटकामध्ये प्लास्टिक पिशव्याच मोलाची भूमिका आहे.

चंद्रपूर : पर्यावरणाबरोबरच वसुंधरेचे रक्षण काळाची गरज बनली असताना प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याऐवजी भर घालणाऱ्या घटकामध्ये प्लास्टिक पिशव्याच मोलाची भूमिका आहे. पर्यावरणाचा समतोल तर, बिघडत आहेत सोबत मुक्या जनावरांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ धजावत नाही. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक पथक स्थापन करून मोहीम आरंभली होती. मात्र आता ते पथकही बेपत्ता झाले आहे.शासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे आदेश निर्गमित केले. परंतु अधिनियम २00६ अन्वये ३ मार्च २00६पासून महाराष्ट्र प्लास्टिक पिशवी बंदीसाठी नियम व अटी बनविण्यात आल्या. त्यानुसार ५0 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८-१२ लांबीपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक थैली वापर व उत्पादनावर बंदी घालण्यात आली. पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्वाकांक्षी कायदा पारित केला परंतु या आदेशाची अंमलबजावणी करणारेच उदासिन असल्याने या कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात या कायद्याची खिल्ली उडविली जात आहे. सर्व नियमांना धाब्यावर बसवून लहानमोठे दुकानदार फळभाज्या विक्रेते, हॉटेल्स व इतर दुकानांमध्ये सर्रास या पिशव्यांचा वापर करीत आहेत. पातळ प्लास्टिक थैली ही अविघटनशील, कुजत नसल्याने स्पष्ट होत नाही व या पिशव्यांवर पुन्हा प्रक्रिया करून पुनर्निर्मिती करता येत नाही. गुरांनाही यामुळे त्रास होतो. (नगर प्रतिनिधी)महानगरपालिकेने प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी काही दिवसापूर्वी पथकाचे गठन केले होते. या पथकाने काही दिवस मोहीम सुरु ठेवली. आता मात्र पथकच बेपत्ता झाले आहे. शहरातील व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पथकाने शहरात पुन्हा मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.