शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

विरोधक जनतेची दिशाभूूल करतात

By admin | Updated: July 27, 2016 01:18 IST

चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही दिवसांपासून डी.व्ही.डी. एफ फंडातील ९३ लाखांच्या निधी बाबत आणि अगदी कमी कालावधीमध्ये केलेल्या विकास कामाबद्दल...

नेरी: चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही दिवसांपासून डी.व्ही.डी. एफ फंडातील ९३ लाखांच्या निधी बाबत आणि अगदी कमी कालावधीमध्ये केलेल्या विकास कामाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे कुटील कारस्थान सर्रास विरोधक करीत आहेत. विरोधकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ग्रामवासियांची दिशाभूल होत आहे, असा आरोप सरपंच रामदास सहारे यांनी केला आहे. मागील १० वर्षांपासून विद्यमान विरोधकांची सत्ता होती. या कालावधीमध्ये त्यांनी गावाचा विकास साधला नाही. त्या काळात नेरी गावातील मोक्याच्या सर्व जागांवर अतिक्रमण करण्यात आले. आता मंगल कार्यालय व दुकान गाळे बांधकाम करण्याकरिता जागा शिल्लक राहिलेली आहे. त्याच्या कामाची पावती म्हणून जनतेने काँग्रेस विचारसरणीच्या प्रगती ग्रामविकास आघाडीला भरघोस मतानी निवडून दिले. एक वर्षाचा कालावधीत नेरी ग्रामपंचायतही विकासाचा महामेरु ठरत आहे. त्यामुळे विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरचा जिल्हा ग्रामविकास निधीअंतर्गत ग्रामपंचायतीना कर्ज स्वरूपात निधी वितरण करण्याचा लोकाभिमुख निर्णय १५ वर्षांत प्रथमच तत्कालीन कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार १२ कोटी ४३ लाख १२ हजार रुपयाचा निधी जिल्हा परिषदेने उपलब्ध केला. हा निधी ०.२५ टक्के व्याजाने अंशदान जिल्हा ग्रामविकास निधी जिल्हास्तरावरील खात्यात जमा करावा लागते. याप्रमाणे नेरी ग्रामपंचायतीने या निधीची मागणी केली असता ९३ लाख रुपये उपलब्ध झाले. या निधीसाठी विरोधकाची संमती घेऊन प्रस्तावावर ठराव घेतला. या निधीचा उपयोग हा गावाचा विकास करण्यासाठी मंगल कार्यालय,दुकान गाळे बांधकामासाठी करण्यात येणार आहे. असेही सदर बांधकामातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. दर वर्षाला १५ गाळ्यामधून एक महिना ६०० रुपये याप्रमाणे एक लाख आठ हजार रुपये व मंगल कार्यालयाचे उत्पन्न पाच लाख, याप्रमाणे होऊन कर्जफेड होणार आहे. तसेच जे लिलाव होईल, त्याचे अंदाजे दोन लाखाप्रमाणे ३० लाख रुपये येतील. १० वर्षामध्ये कर्जफेड होईल. सदर निधी प्रकरणाबद्दल स्थानिक जिल्हा परिषद सदस्या म्हणतात की, मला याबाबतीतील कुठलीही कल्पना नाही. याचाच अर्थ असा की, या सदस्या आपल्या कामात किती तत्पर असतील? कारण हा जिल्हा परिषदेचा निधी आहे. त्यावरुन हे स्पष्ट होते की, विकास करायचा नाही आणि दुसऱ्याला करु द्यायचा नाही. सदर बाबीकडे विरोधक म्हणतात की, हा निधी घेवू नये अन्य निधी घ्यावा. परंतु त्यांना हे माहिती नाही की, कोणता निधी कोणत्या कामाल मिळातो. तसेच मागील पंचवार्षिक मध्ये विरोधकाची सत्ता होती तेव्हा खासदार निधीमधून १० लाखांचा निधी पार्वती मंदिर सभागृह बांधकामासाठी आला होता. पण विरोधकांनी नाहरकत न दिल्यामुळे तो परत गेला. तसेच मॉडेल ग्रामपंचायतीसाठी चार लाखांचा निधी मंजूर झाला असताना आमची सत्ता नाही म्हणून इतरत्र कळविला होता. तसा पत्रव्यवहार केला होता. परंतु आम्ही प्रयत्न करुन तो परत मिळविला, असा दावाही सहारे यांनी केला आहे. सहारे म्हणाले की, ग्रामस्वच्छतेला अधिक महत्त्व देवून गावातील केरकचरा फेकण्यासाठी ट्रक्टर उपलब्ध केले आहे. तसेच मटन मार्केट हटवून तेथील दुर्गंधी दूर केली आहे. नाली बांधकाम व उपसा करण्याचे कार्य केले आहे. यावर विरोधक उलट्या टिपण्या करतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वच्छता मोहिमेचा विसर पडला आहे. पिण्याच्या पाण्याच्याटाकीतील गाळ उपसा करुन याच काळात टँकरने पाणी विहिरीत टाकून लोकांना पुरविले. दूषित पाण्यावर आळा घालण्यासाठी दोन रुपयांमध्ये २० लीटर शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे विरोधकाच्या पोटात दुखत आहे. असा आरोपही सहारे यांनी केला आहे. या पत्रपरिषदेला उपसरपंच वंदना दडमल, सदस्या भावना पिसे, इंदिरा कामडी, रंजना वैरागडे, कंदा पिसे, सचिन पिसे, सदाशिव बोरकर, छबू चौधरी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)