शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

चंद्रपुरातील खुल्या जागांचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:02 IST

शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : विकास आराखडा कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली. मात्र अतिक्रमण जैसे-थे असल्याने विकासासाठी केलेली तरतुद कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या, यासाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या. विविध विकासकामे करण्यासाठी मनपाला आर्थिक स्थिती बळकट करणे गरजेचे आहे. याच हेतुने पाच वर्षांकरिता विविध योजनांचा आराखडा तयार करण्यात आला. शहरातील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले. या बांधकामामुळे महानगरपालिकेला बऱ्यापैकी शुल्क मिळाले. गुंठेवारी जमिनीची प्रकरणे सध्या प्रलंबित असल्याने मनपाला फारसा आर्थिक लाभ झाला नाही. २०१८ -१९ या वर्षामध्ये या कामातून २ कोटी रूपये उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा मनपाला होती. परंतु, गुंठेवारी प्रकरणे फाईलबंद करण्यात आले. शहरातील विविध वार्र्डांमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने ठोस पाउले उचलले नाही. बगिचा निर्माण करण्याकरिता तसेच अस्तित्वात असलेल्या बगिचांचा विकास करण्यासाठी दीड कोटी रूपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली. मात्र, शहरातील अनेक बगिचांच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा झाला आहे. बंगाली कॅम्प तसेच बिनबा मासळी बाजाराचा पूर्नविकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागण्यात आली. हा प्रश्नही अद्याप मार्गी लागला नाही. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असतानाच अतिक्रमणाची प्रकरणेही वाढत आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मनपाने अद्याप कार्यवाही सुरू केली नाही. परिणामी, ज्या हेतुंसाठी निधीची तरतूद करण्यात आली. ते कागदवरच राहिल्याचे दिसून येते. शहर विकास आराखडा तयार करताना अतिक्रमण कसे दूर करता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. अन्यथा अर्थसंकल्पात केलेली तरतूद व नागरिकांना दिलेल्या आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास उडेल.उद्यान विकासाची कामे ठप्पचंद्रपूर शहर विकास योजना आराखडा दर २० वर्षांनी सुधारित करायचा असतो. त्यासाठी मनपाने पाऊल उचलले आहे. पण, विकास योजना आराखडा व भूसंपादन या संदर्भात प्रशासनाची गतिमानता दिसून येत नाही. शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान मिळते. या वर्षी मनपाला २४१.९८ कोटी मिळेल, असा दावा सत्ताधाºयांनी केला. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा झाला नाही. शहरातील विविध वॉर्डांतील उद्यानांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा कागदावरच राहिला आहे.