शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

खरीप तोंडावर आल्याने बाजार समितीत वाढली धान्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र सर्वात मोठे आहे; मात्र मागील पाच वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर व कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढले. ...

जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र सर्वात मोठे आहे; मात्र मागील पाच वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर व कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढले. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. बियाणे, खत व अन्य खर्चासाठी त्यांना पैशाची गरज आहे. अनेक शेतकरी हंगाम जवळ आल्यानंतरच धान्य विक्रीला बाजारात आणतात. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी जीवनावश्यक बाबींचा अपवाद वगळून निर्बंध घातले. पण, जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी सुरू ठेवण्याच्या सूचना पणन महासंघाने दिल्या होत्या. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून धान्य खरेदी केली जात आहे. मूल येथील कृषी उत्पन्न बाजारात धानाची सर्वाधिक आवक आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने दरदिवशी सुमारे दीड हजार क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी केली जात आहे. चंद्रपूर येथील बाजार समितीत निर्बंधाच्या सुरुवातीला धान्य आवक कमी होती. कोरोनाबाबत खबरदारी बाळगल्याने आता धान्याची आवक वाढली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य खरेदी केली जात आहे. कठीण काळात बाजार समितीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शासनाने विमा लागू करण्याची मागणीही केली आहे.

बाजार समितीचे सचिव म्हणतात...

मूल तालुक्यात धान उत्पादकांची संख्या मोठी आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला. त्यामुळे धान विक्रीसाठी बाजार समितीत येत आहेत. धानाच्या दरात चांगली वाढ झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेऊन धान खरेदी सुरू आहे.

-चतूर मोहुर्ले, सचिव, बाजार समिती मूल

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक वाढली. शेतकऱ्यांच्या अडचणींचेही तातडीने निराकरण केले जात आहे. सुरुवातीला आवक कमी होती. पण आता वाढत आहे. बाजार समितीमधील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन दैनंदिन खरेदी केली जात आहे.

-संजय पावडे, सचिव, बाजार समिती, चंद्रपूर

शेतकरी व नागरिक म्हणतात...

शेतीसाठी आता पैशाची तरतूद करणे गरजेचे आहे. चांगला भाव मिळावा, म्हणून धान्य राखून ठेवले होते. खुल्या बाजारात धान्य विकण्यापेक्षा बाजार समितीत विकणे चांगले. शेतकऱ्यांनी हाच पर्याय स्वीकारला पाहिजे.

-शंकर तिमांडे, मूल

शेतीचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. पैशाची व्यवस्था केली नाही तर अडचणी येऊ शकतात. बँकेकडून खरीप कर्ज मिळण्यास उशीर होत आहे. अशावेळी घरी साठवून ठेवलेल्या धान्यामुळे मोठी मदत मिळणार आहे.

-गंगाधर शेंडे, चंद्रपूर