शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या संपादरम्यान काम केलेल्यांनाच मिळाला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून, केवळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यात आला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. काही कर्मचारी चार ते पाच दिवस, काही दहा-बारा दिवस कर्तव्यावर रुजू झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार ७ व ८ डिसेंबरला खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतावणे यांनी दिली. मात्र इतर कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला नसल्याने ओरड सुरु आहे.

११८ कर्मचारी कर्तव्यावरमहामंडळातील चारही आगारात एकूण १३७२ कर्मचारी आहेत. मात्र, बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. बुधवारी प्रत्यक्ष स्थिती ११८ कर्मचारी कर्तव्यावर तर काही सुट्यांवर असे एकूण २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत, 

अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्याकर्तव्यावर रुजू होण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांची वेतनवाढ दिली. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या. पहिल्याच दिवशी प्रशासकीय विभागातील आठ जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही बदल्यांचे सत्र सुरूच आहे. 

मंगळवारी धावल्या दोन बस मागील दीड महिन्यापासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. मात्र मंगळवारी वरोरा डेपोतून एक व चंद्रपूर डेपोतून एक अशा दोन बसफेऱ्या धावल्या. यावेळी चालक-वाहकांनी थोडा गोंधळ केला. मात्र, काही वेळानंतर वरोरा ते भद्रावती व चंद्रपूर डेपोतून सुटलेली बस मूलपर्यंत धावली असल्याची माहिती आहे. वरोरा आगारातून धावलेल्या बसने चार हजाराच्या व रुपयांचा तर चंद्रपूर बसस्थानकातून धावलेल्या बसने दीड हजार रुपयांच्या जवळपासच उत्पन्न कमविले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप